कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्या अनाथ मुलांची यशोमती ठाकूर यांनी घेतली भेट…

    जळगाव : जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा या गावात दौर्यादरम्यान कोविड मुळे पालकांचे छत्र हरवलेली काही अनाथ मुले असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांना मिळाली.

    दरम्यान ही माहिती मिळताच ठाकूर यांना राहवले नाही त्यांनी ताबडतोब जाऊन त्या अनाथ मुलांची विचारपूस केली. शासकीय योजनांचा या मुलांना कसा लाभ देता येईल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना तातडीने निर्देश दिले. इतकच नाही तर काही आर्थिक मदतही तातडीने या मुलांना केली.

    अनाथ बालकांसाठी केवळ शासकीय मदत आणि धोरण यापुरतेच सीमित न राहता व्यापक जाणिवेनं यशोमती ठाकूर सातत्याने राज्यभरात काम करताना दिसतात.