भरपूर पाणी प्यावं, पण म्हणजे नेमकं किती? जाणून घ्या

     

    प्रत्येक अवयवाला कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. माणसाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे त्यामुळे पाण्याला जीवन असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे दिवस भरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. चला तर जाणून घ्या.

    भरपूर पाणी प्यावे, असे आपण नेहमी ऐकतो. पण भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी प्यावे, ते कळत नाही. आणि भरपूर पाणी पिण्याच्या नादात आपण जास्तीचे पाणी पिऊन बसतो. जे आरोग्यास चांगले नसते. तसेच बरेच लोक एकाच वेळी दोन दोन ग्लास पाणी पितात. प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते. १५ वर्षे वय पर्यंतच्या मुलांनी साधारणपणे एक ते दोन लिटर पाणी पिले पाहिजे. प्रौढ व्यक्तींनी तीन ते चार लिटर पाणी दररोज प्यावे. ज्यांचे वय ६० वर्षे पेक्षा जास्त आहे अश्या व्यक्तींनी तीन लिटर पर्यंत पाणी प्यावे.

    तसेच २५ किलो वजनाच्या व्यक्तीने चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे ५० किलो वजनाच्या व्यक्तीने दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. मेहनतीचे काम करणाऱ्यांनी व गरोदर स्रियांनी या पेक्षा थोडे म्हणजे एक दोन ग्लास जास्त पाणी पिल्यास चालते.

    वजनानुसार पाणी पिण्याचे सूत्र

    प्रथम तुमचे वजन मोजा. एकदा शरीराचं वजन  तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला ३० ने भागायचं. येणारी संख्या ही रोज किती लीटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे. समजा वजन ६० किलो असेल तर ते ३० ने भागाकार केल्यास २ ही संख्या मिळेल. म्हणजेच, ६० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज २ लिटर पाणी प्यावं. जर वजन ५० किलो असेल तर १.६ लिटर पाणी प्या.