राज्यात गेल्या ४ दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ, गेल्या २४ तासांमध्ये ७३ जणांचा मृत्यू

शुक्रवारी राज्यात ७३ कोराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू(corona death) झाला आहे. मागील चार दिवसांपासून कोराेनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली असल्याचे समाेर आले आहे.

मुंबई: शुक्रवारी राज्यात ७३ कोराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू(corona death) झाला आहे. मागील चार दिवसांपासून कोराेनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली असल्याचे समाेर आले आहे. गुरुवारी ७२ जणांचा मृत्यू झाला हाेता तर बुधवारी ६६ कोराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नाेंद करण्यात आली आहे तसेच मंगळवारी ६६ कोराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५% आहे.

शुक्रवारी २८९० रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,५८८,९९९ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९४.७५ % एवढे झाले आहे. आज राज्यात ३,६९३ नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे तर राज्यात आज ५१,८३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात ७३ कोराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू पुणे-६, वर्धा-४, नागपूर-३, नाशिक-२, साेलापूर-२, ठाणे-२, औरंगाबाद-१, जालना-१ व लातूर-१ असे आहेत.दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३२, ६७,९१७ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १९,६१,९७५ (१४.७९ टक्के)नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४२,५८५ व्यक्ती हाेमक्वारंटाईन असून ३,०१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.