राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारच्या पार – राज्यात २७ जणांचा मृत्यू

मुंबई:राज्यात ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने गुरुवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०,४९८ वर पोहचली. राज्यात २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या ४५९ झाली

 मुंबई:  राज्यात ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने गुरुवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०,४९८ वर पोहचली. राज्यात २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या ४५९ झाली आहे. आज १८० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत १७७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  राज्यातील कोरोनाबाधितांनी १० हजारचा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.राज्यात गुरुवारी ५८३ नवे रुग्ण सापडले. तर २७ जणांचा मृत्यू झाला. 

यामध्ये मुंबईचे २०, तर पुणे ३ आणि ठाणे २, नागपूर १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १९ पुरुष तर ८ महिला आहेत. मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,४५,७९८ नमुन्यांपैकी १,३४,२४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०,४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ७३३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १०,०९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४२.११ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,६८,२६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १०,६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.