raj thakre and uddhav thakre

कोरोनाचे निर्बंध(Corona Rules) लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर(Local Travel) बंदी घातली आहे. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नसून, लोकांकडून बंदी हटवण्याची मागणी होत आहे.

    कोरोनाची दुसरी लाट(Corona Second Wave) ओसरत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. असं असलं तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत(Mumbai) नागरिकांना प्रवास (Travel In Mumbai) करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

    कोरोनाचे निर्बंध(Corona Rules) लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर(Local Travel) बंदी घातली आहे. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नसून, लोकांकडून बंदी हटवण्याची मागणी होत आहे. या मुद्द्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावलं उचलण्याची मागणी करत राज यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिला आहे.

    मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे हाल होत आहे. त्याकडे राज ठाकरे यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं आहे. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात लोकलमधून प्रवास करण्यासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्याचा सल्ला राज यांनी दिला आहे. “मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी”, असं राज यांनी म्हटलं आहे.