महाराष्ट्रात अजून ३-४ दिवस राहणार परतीचा पाऊस 

यंदा संपूर्ण देशभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे . यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून नागरिकांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.हा परतीचा पाऊस परतायला अजून तीन ते ४ दिवस लागणार आहेत.

यंदा संपूर्ण देशभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे . यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून नागरिकांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.हा परतीचा पाऊस परतायला अजून तीन ते ४ दिवस लागणार आहेत. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात परतीच्या पावसाचा मुक्काम आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे १० ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचा जोर कमी होतो. मात्र यंदा हा पाऊस २१ ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

पुढील ३-४ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण मुंबईत परतीचा पाऊस एक आठवडा लांबणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आपली योग्य ती काळजी घेऊन घराबाहेर पडावे असेही सांगण्यात आले आहे.