शिवसेना सोबत आली नाही मात्र शरद पवारांनी भाजप-रिपाइंसोबत यावं ; रामदास आठवले यांची पवारांना ‘ऑफर’

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी एनडीएमध्ये यावं, त्यांना केंद्रात सत्ता मिळेल. शिवसेना आमच्यासोबत आली नाही मात्र राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं. रिपाइं या पूर्वीही राष्ट्रवादीसोबत होती. त्यामुळं भाजप-राष्ट्रवादी आणि रिपाइं असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो,’ अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आठवले म्हणाले , शरद पवारांसारखा नेता एनडीएमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना त्यांची साथ मिळेल आणि देशाच्या विकासासाठी फायदा होईल. शिवसेनेत राहण्यात फायदा नसल्याचे ते यावेळी म्हणाले.दरम्यान त्यांनी शिवसेनालाही पुन्हा भाजपसोबत युती करण्याचा अवाहन केलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊन एक वर्ष झालं आहे. त्यांची इच्छा असल्यास त्यांना आणखी एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं. उरलेली तीन वर्ष फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं आणि सत्तेत ५०-५० टक्के वाटा ठेवावा, असं आठवले म्हणाले आहेत.