राज्यात एका दिवसात हजार रुग्ण ; आतापर्यंतचे सर्वाधिक १००८ रुग्ण,२६ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात शुक्रवारी तब्बल १००८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे संचारबंदी उठवल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमानात वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल अशी शंका व्यक्त केली जात

मुंबई : राज्यात शुक्रवारी तब्बल १००८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे संचारबंदी उठवल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमानात वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे.
 
शुक्रवारी मुंबईमध्ये २६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 485 वर पोहचली आहे. राज्यात शुक्रवारी १००८ नवे रुग्ण मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११,५०६ वर पोहचली आहे. तसेच राज्यात २६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक १०,मुंबई ५, जळगाव ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्ग १, भिवंडी १, ठाणे १, नांदेड १ , औरंगाबाद १ तर परभणीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या शिवाय उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.
 
मृतांमध्ये १८ पुरुष तर ८ महिला आहेत २६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे. या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. त्याचप्रमाणे शुक्रवारी १०६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,५३,१२५ नमुन्यांपैकी १,४०,५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११,५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ७९२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १०,८४९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४५.३४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 
 
सध्या राज्यात १,६३,०२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ११,६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
 
 
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे
 
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 
१ मुंबई महानगरपालिका ७८१२ २९५ 
२ ठाणे ५१ २ 
३ ठाणे मनपा ४३८ ७ 
४ नवी मुंबई मनपा १९३ ३ 
५ कल्याण डोंबवली मनपा १७९ ३ 
६ उल्हासनगर मनपा ३ ० 
७ भिवंडी निजामपूर मनपा १७ १ 
८ मीरा भाईंदर मनपा १३५ २ 
९ पालघर ४४ १ 
१० वसई विरार मनपा १३५ ३ 
११ रायगड २६ १ 
१२ पनवेल मनपा ४८ २ 
ठाणे मंडळ एकूण ९०८१ ३२० 
१३ नाशिक ६ ० 
१४ नाशिक मनपा ३५ ० 
१५ मालेगाव मनपा २०१ १२ 
१६ अहमदनगर २६ २ 
१७ अहमदनगर मनपा १६ ० 
१८ धुळे ८ २ 
१९ धुळे मनपा १८ १ 
२० जळगाव ३४ ११ 
२१ जळगाव मनपा १० १ 
२२ नंदूरबार ११ १ 
नाशिक मंडळ एकूण ३६५ ३० 
२३ पुणे ६८ ४ 
२४ पुणे मनपा ११७६ ९२ 
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७२ ३ 
२६ सोलापूर ७ ० 
२७ सोलापूर मनपा १०१ ६ 
२८ सातारा ३२ २ 
पुणे मंडळ एकूण १४५६ १०७ 
२९ कोल्हापूर ९ ० 
३० कोल्हापूर मनपा ६ ० 
३१ सांगली २९ ० 
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १ १ 
३३ सिंधुदुर्ग २ १ 
३४ रत्नागिरी ८ १ 
कोल्हापूर मंडळ एकूण ५५ ३ 
३५ औरंगाबाद २ ० 
३६ औरंगाबाद मनपा १५९ ८ 
३७ जालना ३ ० 
३८ हिंगोली २२ ० 
३९ परभणी १ १ 
४० परभणी मनपा २ ० 
औरंगाबाद मंडळ एकूण १८९ ९ 
४१ लातूर १२ १ 
४२ लातूर मनपा ० ० 
४३ उस्मानाबाद ३ ० 
४४ बीड १ ० 
४५ नांदेड ० ० 
४६ नांदेड मनपा ४ १ 
लातूर मंडळ एकूण २० २ 
४७ अकोला १२ १ 
४८ अकोला मनपा २७ ० 
४९ अमरावती २ ० 
५० अमरावती मनपा २६ ७ 
५१ यवतमाळ ७९ ० 
५२ बुलढाणा २१ १ 
५३ वाशिम २ ० 
अकोला मंडळ एकूण १६९ ९ 
५४ नागपूर ६ ० 
५५ नागपूर मनपा १३३ २ 
५६ वर्धा ० ० 
५७ भंडारा १ ० 
५८ गोंदिया १ ० 
५९ चंद्रपूर ० ० 
६० चंद्रपूर मनपा ३ ० 
६१ गडचिरोली ० ० 
नागपूर एकूण १४४ २ 
इतर राज्ये २७ ३ 
एकूण ११५०६ ४८५