आज माय मराठीचा जागर, वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍यावतीने वर्धा येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरीमध्‍ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होत आहे. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगणात साहित्‍य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्‍य नगरी सजली आहे.

    वर्धा- वर्ध्यात (Wardha) आजपासून सारस्वतांचा मेळा, अर्थात माय मराठीचा जागर होणार आहे. वर्ध्यात आजपासून  96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरुवात होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) आहेत. विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍यावतीने वर्धा येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरीमध्‍ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होत आहे. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगणात साहित्‍य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्‍य नगरी सजली आहे. त्यामुळं आजपासून सारस्वतांचा मेळावा भरणार आहे.

    या दिग्गजांची उपस्थिती…

    उद्घाटन आणि समारोप या दोन्ही कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि संमेलनाचे मार्गदर्शक नितीन गडकरी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे आदी जवळपास 19 प्रमुख पाहुणे राहणार आहेत. त्या सर्वांना भेट म्हणून देण्यात येणारा चरख्याावर सूत कताई करण्यात येणार आहे.

    चरखा मुख्य आकर्षण…

    वर्ध्यातील गोपुरी येथील ग्रामोद्योग भांडारात हे चरखे तयार करण्यात आले आहेत. हा चरखा केवळ प्रतिकात्मक राहू नये त्यामुळे प्रत्यक्ष सूत कताई करणारा पेटी चरखा देण्यात येणार आहे. शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सकाळी साडे दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर आहेत. उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रमाला येणार्‍या सर्व प्रमुख पाहुण्यांचा चरखा देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

    चरखाने पाहुण्यांचे स्वागत…

    वर्धा (Wardha) येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येणार्‍या प्रमुख पाहुण्यांच्या आदर सत्कारात साहित्य संमेलनात कार्य करणाऱ्या नियोजन समित्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. उद्घाटन आणि समारोपाला येणाऱ्या पाहुण्यांचं प्रत्यक्ष सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत केले जाणार आहे. परंतु, हा चरखा फक्त स्मृतिचिन्ह नसेल तर त्यावर सूत कताईही करता येणार आहे.