७१३५ ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७५ टक्के मतदान, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी? कोण ठरणार नंबर १

राज्यभरातील ७,१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी देखील मतदान पार पडले.

    मुंबई : राज्यभरातील ७,१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी देखील मतदान पार पडले. सर्वत्र मतदान शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. मतमोजणी येत्या मंगळवारी होणार आहे.

    राज्य निवडणूक आयोगानं ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच तर उर्वरित भागात संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती.

    मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या

    ठाणे – ३५, पालघर – ६२, रायगड – १९१, रत्नागिरी – १६३, सिंधुदुर्ग – २९१, नाशिक – १८८, धुळे – ११८, जळगाव – १२२, अहमदनगर – १९५, नंदुरबार – ११७, पुणे – १७६, सोलापूर – १६९, सातारा – २५९, सांगली – ४१६, कोल्हापूर – ५२९, औरंगाबाद – २०८, बीड – ७७१, नांदेड – १७०, उस्मानाबाद- १६५, परभणी – ११९, जालना – २५४, लातूर – ३३८, हिंगोली – ६१, अमरावती – २५२, अकोला – २६५, यवतमाळ – ९३, बुलडाणा – २६१, वाशीम – २८०, नागपूर – २३४, वर्धा – १११, चंद्रपूर – ५८, भंडारा – ३०४, गोंदिया – ३४५, गडचिरोली- २४. एकूण – ७१३५.