दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, आमदार नितेश राणेंची खळबळजनक मागणी

हे प्रकरण अजून संपले नसून, राज्यात एवढे राजकीय नेते असताना दिशा सालियानच्या मृत्यूबाबत फक्त सर्वजण आदित्य ठाकरेंच्या दिशेने बोटे का दाखवत आहेत, “डाल मे कुछ काला है” त्यामुळं याची केस पुन्हा रिओपन करावी व आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणेंनी केली आहे.

    मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत ह्याने जून २०२० मध्ये मुंबईत आत्महत्या केली. त्यानंतर बरंच राजकीय वातावरण तापलं होतं. अगदी महाराष्ट्र ते बिहारपर्यंत या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची तसेच दिशा सालियान जी सुशांत याची सेक्रटरी होती या दोघांची हत्या नसून, आत्महत्या होती असं सीबीआयनं अहवालात म्हटलं आहे. यावेळी प्रकरणावर पूर्णविराम मिळाला होता, पण काल लोकसभेत पुन्हा एकदा खासदार राहुल शेवाळेंनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे, त्यांनतर यावर चर्चा होत आहे.

    दरम्यान, सुशांतसिंग तसेच दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राणे कुटुंबानंतर आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलंय. रिया चक्रवतीच्या मोबाईलमध्ये AU असा उल्लेख आढळला आहे, म्हणजे आदित्य उद्धव त्यामुळं याचा तपास व्हावा, अशी मागणी लोकसभत शेवाळेंनी केली आहे. यानंतर याचे पडसाद काल हिवाळी अधिवेशनात देखील पाहयला मिळाले. यानंतर आज भाजपा व शिंदे गाटातील आमदार आक्रमक झाल्याचे दिसत आहेत.

    आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा – राणे

    दरम्यान, हे प्रकरण अजून संपले नसून, राज्यात एवढे राजकीय नेते असताना दिशा सालियानच्या मृत्यूबाबत फक्त सर्वजण आदित्य ठाकरेंच्या दिशेने बोटे का दाखवत आहेत, “डाल मे कुछ काला है” त्यामुळं याची केस पुन्हा रिओपन करावी व आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणेंनी केली आहे. एकदाच काय ते होऊन जावू दे…कारण अनेकांचा तसेच सुशांतच्या चाहत्यांचा देखील आदित्य ठाकरेंवर संशय आहे, त्यामुळं त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणेंनी केली आहे.

    शेवाळेंच्या आरोपानंतर काय म्हणाले आदित्य?

    दरम्यान, राहुल शेवाळेंच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंनी जोरदार पलटवार करताना, शेवाळेंवर टिका केली आहे, तसेच सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मला त्या घाणीत पडायचे नाही, सीबीआयने तपास केला आहे. पोलीस पुन्हा तपास करतील, पण ज्याचे लग्न व संसार आम्ही वाचवला ते आमच्यावर आरोप करताहेत. यात मी पडणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.