एअर इंडियाच्या विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडींग, तांत्रिक बिघाडामुळे हवेत इंजिन पडलं बंद

एअर इंडियाच्या (Air India) A320neo विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Air India Plane Emergency Landing)  करण्यात आले. टाटा समूह संचालित विमान कंपनीचे हे विमान टेक ऑफ केल्यानंतर मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) परतले, कारण त्यातील एक इंजिन तांत्रिक समस्येमुळे हवेत थांबले होते.

    मुंबई : एअर इंडियाचे (Air India) A320neo विमान तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या २७ मिनिटांनी मुंबई (Mumbai)  विमानतळावर (Mumbai Airport) परतले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान बदलल्यानंतर प्रवाशांना बंगळुरू (Bangalore) येथे त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यात आले.

    एअर इंडियाच्या A320neo विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Air India Plane Emergency Landing)  करण्यात आले. टाटा समूह संचालित विमान कंपनीचे हे विमान टेक ऑफ केल्यानंतर मुंबई विमानतळावर परतले, कारण त्यातील एक इंजिन तांत्रिक समस्येमुळे हवेत थांबले होते.

    एअर इंडियाच्या प्रवक्त्यानुसार, बेंगळुरूला जाणाऱ्या या विमानातील प्रवाशांना गुरुवारी दुसऱ्या विमानात पाठवण्यात आले आहे. हवाई वाहतूक नियामक महासंचालक नागरी विमान वाहतूक या घटनेची चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एअर इंडियाच्या A320neo विमानांमध्ये CFM लीप इंजिन बसवलेले आहेत.

    या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याला विचारले असता ते म्हणाले की, एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. आमच्या विमानाचे वैमानिक आणि इतर कर्मचारी अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आणि तज्ञ आहेत. या प्रकरणात आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल पथकांनी त्वरित या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.