air india

मुंबई आणि पुणे या दोन कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये थेट विमानसेवा नव्हती. मात्र ही विमानसेवा सुरु करून एअर इंडिया थेट उड्डाण करणारी पहिली ऑपरेटर ठरली आहे.

मुंबई: रोज मुंबई-पुणे प्रवास (Pune To Mumbai Flight Fare) करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांना प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या रेल्वे आणि बसेसची सोयदेखील उपलब्ध आहे. मुंबई-पुणे प्रवास करण्यासाठी चार तास लागतात मात्र हाच प्रवास आता एक तासावर येणार आहे. मुंबई-पुणे प्रवास आता एका तासावर येणार आहे. पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. एअर इंडियाने(Air India) 26 मार्चपासून या दोन शहरांमध्ये थेट उड्डाण (Flight Service) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ तीन तासांवरून एक तासापर्यंत कमी होईल.

काही वर्षांपूर्वी मुंबई-पुणे थेट विमानसेवा होती. मात्र 2019 मध्ये बंद करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई आणि पुणे या दोन कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये थेट विमानसेवा नव्हती. मात्र ही विमानसेवा सुरु करून एअर इंडिया थेट उड्डाण करणारी पहिली ऑपरेटर ठरली आहे. पुणेकर किंवा मुंबईकर दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वे किंवा बसचा वापर करत होते. मात्र लागणारा वेळ पाहता दोन्ही शहरात एअर इंडियाने थेट उड्डाण करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही उड्डाणं शनिवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सध्याच्या वेळापत्रकानुसार चालतील. एअर इंडियाचे विमान पुणे विमानतळावरून सकाळी 11.20 वाजता निघून मुंबईत 12.20 वाजता पोहोचेल. या उड्डाणासाठी बुकिंगही सुरू झालं आहे. एअर इंडियाच्या घोषणेमुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

विमानाचं तिकीट
पुणे-मुंबई: सुटण्याची वेळ: सकाळी 11:20 आणि आगमनाची वेळ: दुपारी 12:20
तिकीट दर: इकॉनॉमी: 2,237 रुपये आणि बिझनेस क्लास: 18,467 रुपये

पुण्यातून थेट जर्मनी , इंग्लंड आणि अमेरिकेसाठी विमानसेवा सुरु होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. त्यासोबतच पुणे विमानतळावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पुण्यातील आठ स्लॉट वाढवण्याची विनंती केली आहे. तब्बल 14 स्लॉट वाढवले. त्यामुळे आता विमानतळावरील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितलं आहे.