
कल्याण : 2019 मध्ये स्वतःसाठी लोकांचा विश्वासघात केलात, त्याचा बदला म्हणून ग्रामपंचायत निवडणूकित लोकांनी तुमची जागा दाखवली असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
पुढे बोलताना शिंदे यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालात यांचा अपक्षांपेक्षाही मागे सातव्या नंबर म्हणजे शेवटून पहिला नंबर असल्याचा टोमणा ही नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली ग्रामीण भागातील खोनी गाव शिवसेना शाखेचे उदघाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे याना लक्ष केले. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल किंवा ठाणे जिल्हा असेल आपल्याला निधीची कमतरता नाही. येणाऱ्या महापालिका , ग्रामपंचायत, लोकसभा विधानसभा, निवडणुका जिंकायची असेल तर संघटनात्मक ताकद वाढवावी लागेल, घराघरापर्यंत सरकारचं काम पोहोचवावं लागेल, जोमाने कामाला लागा,घरा घरात शिवसैनिक तयार झाला पाहिजे शिवसेना पोहोचली पाहिजे, असे काम करा ,हेवेदावे सोडून संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्या असे आवाहन उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना केलं .पुढे बोलताना जनतेचा मुख्यमंत्र्यांवर असलेला विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललाय, या वाढत्या विश्वासावर शिक्कामोर्तब करण्याचं काम यंदाच्या ग्रामपंचायती च्या निवडणुकीतून झालंय, काही लोक ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्ष चिन्हावर होत नाहीत असे म्हणाले पण जर जर आमच्या ठिकाणी ते असते तर आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाल्या असं बोलले असते.
2019 मध्ये स्वतःसाठी तुम्ही लोकांचा विश्वासघात केलात त्याचा बदला लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घेतल्याचा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला .पुढे बोलताना ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये तुमची जागा लोकांनी दाखवली आहे,निकालात अपक्षांपेक्षाही मागे सातव्या नंबर म्हणजे शेवटून गेलेत शेवटी पहिला नंबर असल्याचा टोमणा ही लगावला नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला .