
मुंबई : आज मुंबईच्या वाय.बी. सेंटरमध्ये दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु, प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी चर्चा करीत या चर्चांना विराम दिला आहे. एका विशेष कार्यक्रमासाठी शरद पवार यांनी आंमत्रित केले असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण देत, ही एक औपचारिक भेट होती. आम्ही 12 जणांनी मिळून एकत्र केवळ कॉफी घेतली त्याव्यतिरिक्त आम्ही काहीही केले नाही, असे त्यांनी यावेळी माध्यामांशी बोलताना सांगितले.
बीजेपीला कायम विरोध
पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. माझा बीजेपीला कायम विरोध आहे. कॉंग्रेस घेत नाही म्हणून बीजेपीत जाणार आहे.
शासनाने जरांगे पाटलांबरोबर शासनाने इमानदारीने बोलावे, हे जे 4, 5 महिने देताहेत ते चुकीचे आहे. 20 ते 25 वर्षे झालेत, दुसरीकडे लग्न झालेले नाही. कौटुंबिक समस्या आणि व्यक्तिगत समस्या आहे. या क्लासचा मोठा पाठिंबा आहे.
जातीय जणगणना झाली पाहिजे
ज्याला मराठीत ठासणी असे म्हणतात, मुलीचे आई-वडील मी जेव्हा ठरवायला जातो त्यावेळी विचारतात मुलगा काही करतो , कामधंदा करतो का, अशा बेरोजगार तरुणांचा मनोज जरांगेंना उत्स्फूर्त पाठिंबा आहे. राजकारण्यांनी आता या गोष्टीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कोणतीही जात प्रबळ नाही, महाराष्ट्राची जातगणना झाली पाहिजे.
इकॉनोमिक डेस्पिरीट वाढले
मनोज जरांगेंच्या निमित्त निर्माण झालेले वादळ शासनाने गांभीर्याने घेतले पाहिजे.
मनोज जरांगेंच्या सभेला होणारी गर्दी ही उत्स्फूर्त आहे. यांना फंडींग कोण करीत आहे. मराठा क्रांती मोर्चा हा उत्स्फूर्त आहे. त्यामागे कोणीही नाही.
कंत्राटी कामाबद्दल सरकार सामन्या नागरिकांची आणि तरुणांची फसवणूक करीत असल्याचा दावा……