संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल (Climate Change) दिसत आहे. त्यात राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा मोठा फटका (Heavy Heat) बसत आहे. असे असताना आता मान्सूनबाबत मोठी माहिती समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनला पाच दिवसांचा विलंब होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल (Climate Change) दिसत आहे. त्यात राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा मोठा फटका (Heavy Heat) बसत आहे. असे असताना आता मान्सूनबाबत मोठी माहिती समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनला पाच दिवसांचा विलंब होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. त्यात आता मान्सूनबाबत माहिती समोर आली आहे. सामान्यपणे मान्सून 21 मे रोजी पोर्टब्लेयरला पोहोचतो. नंतर 11 दिवसांनंतर केरळला म्हणजे एक जून रोजी दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून दोन-तीन दिवस विलंबाने पोहोचेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच केरळमध्ये 5 ते 9 जूनदरम्यान यंदा मान्सून होऊ शकतो, असाही अंदाज आहे.

    कालच दिला होता इशारा

    मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मंगळवारी उन्हाची तीव्रता अधिक होती. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात वातावरण कोरडे असून, कमाल तापमान हे सरासरी इतके होते. उत्तर महाराष्ट्रात उन्हासोबत उकाडाही जाणवत होता. पण आता पुढील दोन दिवस मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज कालच वर्तवण्यात आला होता.

    विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज

    उत्तरेकडील पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात बदल झाल्याने गुरुवारी उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

    चक्रीवादळाची शक्यता

    23 ते 26 मे दरम्यान चक्रीवादळाची शक्यता आहे. यादरम्यान अरबी समुद्रातून आर्द्रतेचाही पुरवठा होणार असल्याने जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या राज्यांत जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.