‘भारत जोडो’ पदयात्रेतील काँग्रेस नेत्याचे हृदयविकाराने निधन

नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये 'भारत जोडो' यात्रेचा आज पहिला दिवस आहे. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास 'भारत जोडो' यात्रा वणाळी गुरुद्वारापासून नांदेडच्या दिशेने सुरू झाली. पदयात्रा मार्गक्रमण करत असताना सेवा दलाचे शेकडो कार्यकर्तेही यात सहभागी झाले. कृष्णकुमार पांडे हे झेंडा तुकडीच्या संचलनाचे प्रमुख होते. यात्रेत चालत असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

    नांदेड – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाली. आज सकाळी महाराष्ट्रातील टप्प्याला (Bharat Jodo Yatra In Maharashtra) सुरुवात झाली. मात्र, यात्रेवेळी काँग्रेस सेवादलाचे समन्वयक कृष्णकुमार पांडे (Krishnakumar Pandey) यांचे देगलूर येथे हृदयविकाराच्या (Heart Attack) धक्क्याने निधन झाले.

    नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेचा आज पहिला दिवस आहे. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘भारत जोडो’ यात्रा वणाळी गुरुद्वारापासून नांदेडच्या दिशेने सुरू झाली. पदयात्रा मार्गक्रमण करत असताना सेवा दलाचे शेकडो कार्यकर्तेही यात सहभागी झाले. कृष्णकुमार पांडे हे झेंडा तुकडीच्या संचलनाचे प्रमुख होते. यात्रेत चालत असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

    या घटनेने भारत जोडो यात्रेवर शोककळा पसरली. यात्रेच्या कॅम्पमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच. के. पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहिली. श्रीकृष्ण पांडे हे नागपूर येथील असून त्यांच्या निधनावर यात्रेत असलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.