वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टावर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोर्टाने सुद्धा घटनेचा अपमान करायचं ठरवलं आहे असंच दिसतंय, कारण न्यायालया सुद्धा संविधानाप्रमाणे काम करत नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था लांबणीवर गेल्या आहेत, यावर राज्य निवडणूक आयोग व सर्वोच्य न्यायालय स्पष्ट भूमिका घेत नसल्यावरुन त्यांनी नाराजी व्यक करत टिका केली.
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. याला कारण म्हणजे राजकीय ओबीसी आरक्षण. राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टावर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोर्टाने सुद्धा घटनेचा अपमान करायचं ठरवलं आहे असंच दिसतंय, कारण न्यायालया सुद्धा संविधानाप्रमाणे काम करत नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था लांबणीवर गेल्या आहेत, यावर राज्य निवडणूक आयोग व सर्वोच्य न्यायालय स्पष्ट भूमिका घेत नसल्यावरुन त्यांनी नाराजी व्यक करत टिका केली. आज अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलले.
दरम्यान, एकंदरीत देशभरामध्ये संविधानाप्रमाणे वागायचं नाही, असंच ठरलेलं दिसतंय.सभागृहाचा पाच वर्षांचा कालखंड संपण्याअगोदरच नवीन निवडून आलेल्या सदस्यांचं गठीत होणं हे गरजेचं आहे. ही जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे. विधानसभा आणि लोकसभा ही केंद्राची जबाबदारी आहे. तर राज्यातल्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे जे प्रतिनिधी आहेत. एकंदरीत देशभरामध्ये संविधानाप्रमाणे वागायचं नाही, असंच ठरलेलं दिसतंय. राज्य निवडणूक आयोगावरती अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने राज्याच्या निवडणूक आयोगाने लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या निवडणुका योग्य वेळेत घेतल्या नाहीत. ताबोडतोब निर्णय आणि निवडणूका घ्या, हे करण्याऐवजी तुम्हाला योग्य वाटत असेल तेव्हा निवडणुका घ्या, असा दिलेला न्यायालयाने निर्णय हा घटनेला धरुन नाहीये. स्पष्ट आणि ठोक भूमिका न्यायालयाने घेणं अपेक्षित होतं. पण तसेच होताना दिसत नाही, त्यामुळं एकंदरीत देशभरामध्ये संविधानाप्रमाणे वागायचं नाही, असंच ठरलेलं दिसतंय. अशी टिका प्रकाश आंबेडकरांनी केली.