उरण रहिवाशांच्या डोक्यावर मृत्यूची  घंटा ; १४ इमारती अति धोकादायक; ७० इमारती धोकादायक

उरण शहरात १४ इमारती अति धोकादायक असून ७० इमारतीची दुरवस्था झाली आहे. एकूण ८४ इमारतीची पडझड झाल्याने या इमारतीमधिल रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला उरण नगर परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.

    उरण :  उरण शहरात १४ इमारती अति धोकादायक असून ७० इमारतीची दुरवस्था झाली आहे. एकूण ८४ इमारतीची पडझड झाल्याने या इमारतीमधिल रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला उरण नगर परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.तरी शहरातील जिर्ण झालेल्या काही इमारतींमधिल रहिवाशी आपला जीव मुठीत घेऊन आज हि वास्तव करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
    उरण नगर परिषदेच्या वतीने या अगोदर ही जीर्ण झालेल्या इमारती मधील रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तवात जावे असे नोटीसाच्या माध्यमातून सुचित केले आहे. तरी ही धोकादायक इमारतीमधील रहिवासी आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून वास्तव करत असल्याचे चित्र सर्रास पहावयास मिळत आहे. या संदर्भात उरण नगर परिषदेकडून शहरातील धोकादायक इमारतींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता; उरण नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे की शहरात एकूण ८४ इमारती धोकादायक आहेत. त्यातील १४ इमारती या अतिधोकादायक असून ७० इमारतीची दुरावस्था झाली आहे. यासंदर्भात सदर इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
    उरण शहरातील काही इमारतींमध्ये आजही रहिवासी आपल्या कुटुंबासह वास्तव्य करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडली तर, असा प्रश्न शासकीय अधिकारी वर्गासमोरच आवासून उभा राहिला आहे. उरण शहरातील रहिवाशांच्या जीवाची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी मनसेचे उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.