
सोलापूर मध्ये अविवाहित तरूणानी नवरदेव मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा धडकला आहे, काही तरुण घोडयावर बसून लग्नाचा सूट – बूट घालून या मोर्चात सहभागी झाले आहेत. तरूणाच असं म्हण आहेकी लग्नासाठी मुली मिळत नाही अशी तक्रार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आहेत. विविध भागातील तरूण मंडळी या मोर्चामध्ये सहभागी आहेत. मोर्चातील तरूणाची एकच मागीणी आहे ‘आम्हाला मुलगी द्या.’ हा मोर्चा ज्योतिक्रांती च्या वतीने काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे, तसेच हा मोर्चा काढण्याचा उद्देश देखील सांगण्यात आला तो की साध्या मुलींचा तुटवडा जानवत असल्याने, तसेच मुलांच्या तुलनेत मुलींच प्रामाण हे कमी असे दिसून येत आहे, गरीबा मुलांना मुली मिळत नाही. सरकारी नोकरी, व्यवसाय इत्यादी तरूणाला मुली मिळता मात्र गरीब मुलांना मुली मिळत नाही असे विविध प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
लग्न म्हटल की दोन परिवार आणि पाहुणे मंडळी पूर्वी काळी लग्न ही लगेच होत मात्र आता लग्न म्हटल की आधि प्रश्न केला जातो मुलगा काय काम करतो? त्यानंतर त्यांच्या परिवारची विचारणा केली जाते? इत्यादी गोष्टी बघितल्या जातात, पूर्वी काळी मुलीची मत ही तेवढ्या प्रामाणात विचारली जात नव्हती पण आता मुलीच्या मतांचा विचार केला जातो, त्यांच्या मना विरुध्द लग्न केल जात नाही.