समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा कायम, 8 जूनला होणार पुढची सुनावणी

आज समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआय त्यांना दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांना 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.

    आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aaryan Khan Case) मोठी अपडेट समोर येत आहे. या कथित खंडणी कांडात काल समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि समीर वानखेडेची (sameer wankhede) चॅट (whatsapp chat) व्हायरल झाल्यानंतर वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी आता समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशीही सध्या सुरू आहे. समीर वानखेडे यांनी सीबीआय अटकेच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआय त्यांना दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांना 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.

    समीर वानखेडेंवर कोणते आरोप

    समीर वानखेडेवर  आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यन खानला आरोपी न करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे.  या आरोपाखाली सीबीआयने समीर वानखेडविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयने अलीकडेच वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयकडे दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात आपल्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, अशी विनंतीही केली आहे. वानखेडे यांच्या अर्जावर खंडपीठाचा निर्णय येणे बाकी आहे.

    नेमंक प्रकरण काय?

    एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.