मंत्रिपद मिळाल्यास विकास करेन; पंकजा मुंडेंकडून इच्छा व्यक्त

पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'जिथे मी तेथे तुमची साथ आहे. घुमून-फिरुन मला सांगितले जाते की परळीला सांभाळा. आता काय करता, परळीची एक चूक किती महागात पडली हे माहिती आहे ना.

    परळी – मंत्रिपद मिळाल्यास विकास करेन, असे म्हणत पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी येथे तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा बोलत होत्या.

    पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘जिथे मी तेथे तुमची साथ आहे. घुमून-फिरुन मला सांगितले जाते की परळीला सांभाळा. आता काय करता, परळीची एक चूक किती महागात पडली हे माहिती आहे ना.

    पंकजा म्हणाल्या, माझी चूक झाली असेल. विकास करण्यात, देण्या-घेण्यात चूक झाली असेल मला वेळ मिळाला नसेल, पण आता मला वेळच वेळ आहे. लोकशाहीत प्रत्येकाला चुकीची किंमत चुकवावी लागते.

    पंकजा मुंडे म्हणाल्या, मी थांबणार नाही, झुकणार नाही. मी पातळी सोडून कधीही शत्रूवर टीका केली नाही. माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. संघर्षाला मी घाबरत नाही. सरकार आले, मंत्रीपद मिळाल्यास मी विकास करेल.

    पंकजा म्हणाल्या, मी कधीही सूडबुद्धीने, पातळी सोडून वागले नाही. हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. मी सेवा करताना मागे राहिले असेल. एखाद्या माणसाचा नमस्कार मला दिसला नसेल. मात्र, या गर्दीत न दुखावता कुणी राहू शकत नाही. गोपीनाथ मुंडेंचा पराभव झाला, तेव्हा भारतात सर्वच नेते पडले होते. त्यानंतर उत्तमराव पाटील यांनी मुंडेंना प्रदेशाध्यक्ष केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.