मला उमेदवारी दिली असती तर…, छत्रपती संभाजीराजे यांचे वक्तव्य

जे कोणाची सरकार येईल त्याने सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थी विद्यार्थ्यांथी तसेच समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात जे १५ दिवसांत घडल आहे.

    पुणे – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे राऊतांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. यावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मला जर उमेदवारी दिली असती तर, एवढा खेळखंडोबा झाला नसता.

    जे कोणाची सरकार येईल त्याने सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थी विद्यार्थ्यांथी तसेच समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात जे १५ दिवसांत घडल आहे. ते बरोबर झालेले नाही. जर मला उमेदवारी दिली असती तर, आज खेळखंडोबा झाला नसता असे यावेळी संभाजीराजे यांनी म्हटले आहे.