…तर सत्ता गमवावी लागेल; शरद पवारांचा सरकारला इशारा

युवा संघर्षयात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरूणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे. कंत्राटी भरतीचा (Contract Jobs) मुद्दा युवासंघर्ष यात्रेतून उपस्थित झाला आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या संघर्षयात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

    पुणे : युवा संघर्षयात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरूणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे. कंत्राटी भरतीचा (Contract Jobs) मुद्दा युवासंघर्ष यात्रेतून उपस्थित झाला आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या संघर्षयात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे दिला.

    युवकांच्या विविध प्रश्नासंदर्भात कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. ८०० किलोमीटर अंतराचा प्रवास राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे, अशी तरूणांची अपेक्षा आहे. त्याची सुरूवात संघर्ष यात्रेतून झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन शक्य हे, असे पवार यांनी सांगितले.

    ते म्हणाले की, ८०० किलोमीटर अंतराचा प्रवास संघर्ष यात्रेकडून होणार आहे. हा प्रवास सुमारे 45 दिवसांचा आहे. ही यात्रा तरूणांना आत्मविश्वास देणारी ठरेल. यात्रेचा प्रांरभही उत्तम झाला आहे. युवा वर्गाचा कंत्राटी भरतीचा मुद्दा यात्रेच्या सुरूवातीलाच उपस्थित करण्यात आला आणि सरकारला त्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा लागला. हे या यात्रेचे यश आहे.