“जर तुमची कामं झाली नाहीतर… भाजपा कार्यालय फोडा”; कुणाल राऊत यांच्या अजब सल्लानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाले…

लाठ्या काठ्या अंगावर घ्या, तुमचे हात तुटो, पाय तुटो, जेल जा, वेळ पडलीच तर भाजपचे कार्यालय फोडा, रस्त्यावर उतरुन कामे करा, तर लोक तुम्हाला साथ देतील. तुम्ही हिरो झाल्याशिवाय लोक तुमच्या मागे येणार नाहीत असा अजब सल्ला कुणाला राऊत यांनी दिला.

जळगाव : राजकीय नेते काय बोलतील किंवा कोणतं वक्तव्य करतील याचा काही नेम नाही. वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी अनेक राजकीय पक्षातील नेते प्रसिद्ध आहेत. दरम्यान, आता माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी एक धक्कादायक व अजब वक्तव्य केलं आहे. “जर तुमची कामं झाली नाही, जर लोकांची कामं झाली नाहीतर… भाजपा (BJP) कार्यालय तोडा व फोडा, मंत्र्याच्या गाडी पुढे आडेव व्हा”, असा अजब सल्ला कार्यकर्त्यांना एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. कुणाल राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात असून, राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.

पुढे बोलताना कुणाल राऊत म्हणाले की, राज्यात काँग्रेस पक्षाची (Congress) जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला आपणच जबाबदार असल्याचे कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी म्हटलं आहे. वेळ पडली तर भाजपा (BJP) कार्यालय फोडा. लाठ्या काठ्या खा, जेलमध्ये जा तरच लोक तुमच्या मागे धावतील अशा प्रकारचा अजब सल्ला कुणाल राऊत यांनी दिला आहे. त्यामुळं  कुणाल राऊत यांच्या अजब सल्लानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकांना जर आपल्यासोबत घ्यायचे असेल तर त्यांच्या कामासाठी युवकांनी आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे. असं राऊत म्हणाले.

लाठ्या काठ्या अंगावर घ्या, तुमचे हात तुटो, पाय तुटो, जेल जा, वेळ पडलीच तर भाजपचे कार्यालय फोडा, रस्त्यावर उतरुन कामे करा, तर लोक तुम्हाला साथ देतील. तुम्ही हिरो झाल्याशिवाय लोक तुमच्या मागे येणार नाहीत असा अजब सल्ला कुणाला राऊत यांनी दिला. कुणाल राऊत यांनी आपली परखड भूमिका मांडताना काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीवर जोरदार टीका केली.