
महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केले आहे. 'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य आहे', असे विधान त्यांनी केले.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केले आहे. ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य आहे’, असे विधान त्यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. त्यावर फडणवीस यांनी मोठं विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येणे बाकी आहे. त्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे त्यांच्या हे लक्षात आलं असेल की उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यांचं सरकार परत येऊ शकणार नाही’.
मी वकील आहे, मी हे…
मी वकील आहे. मी हे सांगू शकतो की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे त्यांना परत आणून बसवणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणं योग्य राहणार नाही. जी आमची भूमिका आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की, निकाल योग्य पद्धतीने लागेल.
हे सरकार स्थिर
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असे आजच माझं भाकीत सांगतो, असे त्यांनी म्हटले आहे.