
खासदार शिंदे यांनी उपरोक्त अपेक्षा नव्या आयुक्तांकडून केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची बदली झाली आहे.
कल्याण : राज्य सरकारच्या विविध योजनेमधून निधी प्राप्त झालेला आहे. रस्त्यांची विकास कामे, उड्डाणपूलाची कामे आहेत. कचऱ्याचा प्रश्न सुटणार अशी सर्व विकास कामे जलदगतीने झाली पाहिजेत. नव्या महिला आयुक्तांकडून जलगदगतीने आणि युद्धपातळीवर कामे होतील अशी आम्हाला आपेक्षा आहे असे विधान कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
हिंदूह्रदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त आज कल्याणच्या भगवा तलावा परिसरातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास खासदार शिंदे यांनी अभिवादन केले. या वेळी आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख रवी पाटील कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, मोहन उगले अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी खासदार शिंदे यांनी उपरोक्त अपेक्षा नव्या आयुक्तांकडून केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नव्या आयुक्त इंदूरानी जाखड यांची वर्णी लागली आहे. यासंदर्भात खासदार शिंदे यांनी ही आपेक्षा व्यक्त केली. खासदार शिंदे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात प्रथम महिला आयुक्त लाभल्या आहेत. महिलाही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. नव्या आयुक्त जाखड यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात आणि मंत्रालयात काम केले आहे. त्यांच्याकडून कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे चांगले काम होईल याकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनानंतर खासदार शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्व आखून दिले होते. त्यांचे तत्व आणि विचार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे घेऊन जाण्याचे काम करीत आहेत. या सरकारमध्ये नागरीकांच्या समस्या सोडविला जात आहेत.