chandrakant patil

आजीने आणलेली आणीबाणीही चुकीची होती हे राहुल गांधी यांनी आता मान्य केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी ज्या चुकीच्या, तथ्यहीन आणि तिरस्करणीय टिप्पण्या केल्या होत्या, त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी. अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

    मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आणीबाणी संदर्भात विधान केलं होतं. त्यावरून आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, आजीने आणलेली आणीबाणीही चुकीची होती. अशा प्रकारची खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

    काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

    आजीने आणलेली आणीबाणीही चुकीची होती हे राहुल गांधी यांनी आता मान्य केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी ज्या चुकीच्या, तथ्यहीन आणि तिरस्करणीय टिप्पण्या केल्या होत्या, त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी. नाहीतर काही वर्षानंतर याचीही जाणीव त्यांना होईल आणि मग माफी मागितली जाईल, पण नंतर देशातील जनता त्यांना माफ करणार नाही. राहुल गांधी माफी मागता मागता थकून जातील पण त्यांच्या गुन्ह्यांची मोजणी संपणार नाही. अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

    पुढे ते म्हणाले की, आणीबाणीच्या काळात ज्या लोकांचे जीव गेले, त्यांनी ज्या प्रकारे लोकशाहीची हत्या केली… ते माफ करण्यासारखे आहे का? लाखो लोकांना इंदिरा गांधी यांना जो जो कोणी विरोध करेल त्या लाखो लोकांना जेलमध्ये टाकले जायचे, लाखोंचे संसार उध्वस्त झाले. हजारो लोक जेलमध्येच मेले. अशा प्रकारची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.