
मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकातं पाटील यांनी माझं तिकीट कापलं असं म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत ते तिकीट आणि व्होट बँक पक्षाची असते असं म्हटलं. तसंच ही व्होट बँक वर्षानुवर्षे मेहनत घेत विकसित करण्यात आलेली असल्याचं सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला,” असं ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या निवडणूक तिकिटांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा रोख हिंदू व्होटबँकेपर्यंत नेला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवला’ असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकातं पाटील यांनी माझं तिकीट कापलं असं म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत ते तिकीट आणि व्होट बँक पक्षाची असते असं म्हटलं. तसंच ही व्होट बँक वर्षानुवर्षे मेहनत घेत विकसित करण्यात आलेली असल्याचं सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला,” असं ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, तयार असलेली वोटबँक तुम्हाला मिळते, त्यासाठी थोडासा तुमचा चेहरा, तुमचं नाव त्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे माझं तिकीट कापलं म्हणून मी नाराज अशी कार्यपद्धतीच भाजपात नाही. परंतु एखाद्याचं तिकीट कापल्यानंतर माणूस म्हणून काही वेळ नाराज वाटतं. चंद्रकांत बावनकुळे यांच्या आयुष्यात त्या दिवशी काय प्रसंग आला होता त्याचा साक्षीदार मी आहे. परंतु त्या कुटुंबाने हे विष पचवलं आणि त्याचं यश त्यांना आज मिळालं.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करून तारे तोडले आहेत. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपाची छिंदम प्रवृत्ती आहे. व्होट बॅंकेच्या हिन राजकारणाशी शिवरायांचा संबंध जोडता? असा सवालही त्यांनी केला. शिवराय हे सद्विचारांचे प्रतिक आहेत व भाजपा कुविचारांचे- त्यामुळे तुलना पातकच असून पाटील यांनी माफी मागण्याची मागणी सावंत यांनी केली.