
मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी पालिका प्रशासन अनेक उपाय योजना करत आहे. आता मधुमेह आणि उच्च रकतदाब असणाऱ्या रूग्णांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. पुढील आठवडयात हे सर्व्हेक्षण सुरु केले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने ही कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये मधुमेह, हायपरटेन्शन, कॅन्सर तसेच स्ट्रोक या आजारांची माहिती घेतली जाणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा म्हणाल्या, या सर्व्हेक्षणामध्ये एकूण सहा हजार लोकांची माहिती घेण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईवर कोरोनाचे सावट आहे. शहरात दररोज कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांना कोविड संसर्गाचा अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. यानंतर मुंबई महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. लोकांमध्ये किती आणि कोणते असंसर्गजन्य आजार आहेत याची माहिती मुंबई महानगर पालिका घेणार आहे. यासाठी पालिकेकडून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी पालिका प्रशासन अनेक उपाय योजना करत आहे. आता मधुमेह आणि उच्च रकतदाब असणाऱ्या रूग्णांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. पुढील आठवडयात हे सर्व्हेक्षण सुरु केले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने ही कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये मधुमेह, हायपरटेन्शन, कॅन्सर तसेच स्ट्रोक या आजारांची माहिती घेतली जाणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा म्हणाल्या, या सर्व्हेक्षणामध्ये एकूण सहा हजार लोकांची माहिती घेण्यात येणार आहे.
तीन टप्प्यांमध्ये हे सर्व्हेक्षण करण्यात येईल. १८ ते ६९ वयोगातील लोकांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणाच्या या ३ टप्प्यांमध्ये पहिल्यांदा मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर नागरिकांचे बॉडी मास इंडेक्स तपासला जाईल. यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात रक्त चाचणी किंवा लघवीचा तपास करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून मुंबईकरांमध्ये असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण किती आहे याची माहिती मिळेल. त्याचप्रमाणे त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे यावर उपाय शोधण्यात येणार आहेत. मुंबईकरांना कोविड पासून वाचविण्यासाठी पालिका असे अनेक उपाय शोधत असून त्यास नागरिकांची साथ मिळत आहे.