माता न तू वैरीणी – आईने तीन महिन्यांच्या मुलीची केली हत्या, कारणं ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

मुलगा न झाल्यामुळे सासरच्या मंडळींच्या Crime)टोमण्यांना वैतागून तीन महिन्यांच्या मुलीची हत्या (Kalachowky Baby Girl Murder) केल्याची कबुली आईने दिली. मुंबईतील काळाचौकी(Mother Killed Her Daughter) परिसरातील फेरबंदर भागात संघर्ष सदन इमारतीत मंगळवारी ही घटना घडली होती.

    मुंबई : मुंबईतील (Mumbai)काळाचौकी परिसरातून तीन महिन्यांच्या मुलीचं अपहरण झाल्याचा बनाव रचणाऱ्या आईचं पितळं उघडं पडलं. मुलगा न झाल्यामुळे सासरच्या मंडळींच्या Crime)टोमण्यांना वैतागून तीन महिन्यांच्या मुलीची हत्या (Kalachowky Baby Girl Murder) केल्याची कबुली या आईने दिली. आईने पोटच्या पोरीची हत्या(Mother Murdered Daughter) करुन तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता.

    मुंबईतील काळाचौकी परिसरातील फेरबंदर भागात संघर्ष सदन इमारतीत मंगळवारी ही घटना घडली होती. भांडी विकणाऱ्या महिलेने आपल्या बाळाचं अपहरण केल्याची खोटी तक्रार सपना मगदूम हिने पोलिसात केली होती. मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ३० ते ३५ वर्षाची महिला आली आणि जुन्या मोबाईलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचं आमिष तिने दाखवलं. जुना मोबाईल आणण्यासाठी आपण आतल्या खोलीत गेलो, तेव्हा भांडी विक्रेती महिला मागून आली आणि तिने गुंगीचे औषध नाकाला लावून आपल्याला बेशुद्ध केलं. त्यानंतर पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या बाळाला या महिलेने पळवून नेलं, असा बनाव आरोपी महिलेने केला होता.

    महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि संशयित महिलेचं रेखाचित्र तयार करुन घेतलं. ते जारी करत महिलेचा शोधही सुरु झाला. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात आले. गुन्हे शाखेला या घटनेचा समांतर तपास करत होती. घटनेचे अधिक तपशील मिळवण्यासाठी त्यांनी तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला चौकशीसाठी बोलावलं. मात्र महिलेचे सतत बदलणारे जबाब ऐकून गुन्हे शाखेला संशय येऊ लागला. त्यांनी कसून चौकशी केली असता महिलेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पाण्याच्या टाकीतून बुडवून बाळाची हत्या केल्याचं तिने सांगितलं. विशेष म्हणजे ती टाकी घरातच होती.

    आरोपी महिलेचा विवाह २०११ मध्ये झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. दुसऱ्यांदा गर्भवती असताना तिच्या गर्भात मुलगी असल्याची कुणकुण कुटुंबीयांना लागली. त्यामुळे त्यांनी महिलेचा गर्भपात केला. अशाच प्रकारे आणखी तीन वेळा तिचा गर्भपात करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर सासरच्या कुटुंबीयांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले. याच रागातून तिने बाळाची हत्या केल्याचा आरोप आहे.