मध्य रेल्वेवरील फलाट तिकीटदरात कपात! आता फलाट तिकिट ५० रुपये ऐवजी फक्त १० रुपये

मध्य रेल्वेने मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा असलेल्या मुंबईतील सहा स्थानकांचे फलाट तिकीट दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ५० रुपये असलेले फलाट तिकीट हे पूर्वीप्रमाणे दहा रुपये होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

    मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कोरोना संसर्गाचा कमी झालेला धोका, शिथिल झालेले र्निबध यामुळे मध्य रेल्वेने मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा असलेल्या मुंबईतील सहा स्थानकांचे फलाट तिकीट दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ५० रुपये असलेले फलाट तिकीट हे पूर्वीप्रमाणे दहा रुपये होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

    दरम्यान या सर्वांची अंमलबजावणी सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकात गुरुवार, २५ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. करोनाचा संसर्ग वाढल्याने रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मार्च २०२० पासून मुंबईतील काही महत्त्वाच्या फलाट तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. तो दर आता पूर्ववत केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

    मार्च २०२० म्हणजे कोरोना आणि लॉकडाऊन नंतर रेल्वेनं तिकिट दरांत वाढ केली होती. १० रुपयांचे तिकिट तब्बल ५० रुपये केले होत, त्यामुळं प्रवाशामध्ये नाराजीचा सूर होता, कोरोना आणि लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार गेले, बेरोजगारी वाढली त्यातच भरीत भर म्हणजे रेल्वेने तिकिट दरवाढ केली होती. त्यामुळं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.

    कोरोनाच्या धरतीवर ९ ते १० महिने रेल्वे सामान्यांसाठी बंद होती, रेल्वेने प्रवास करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते, पण कोरोनाचे ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून रेल्वे लोकलने प्रवासाची मुभा देण्यात आली आआहे.