महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस  संदिप देशपांडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस  संदिप देशपांडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस  संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली आहे की, नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१डिसेंबरला निर्बंध शिथिल करावे. देशपांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “वर्षभर आम्ही तुमचे ऐकले, एक दिवस आमचे ऐका! नागरिकांना ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या !, अशी विंनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.

मुंबई (Mumbai).  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस  संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली आहे की, नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१डिसेंबरला निर्बंध शिथिल करावे. देशपांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “वर्षभर आम्ही तुमचे ऐकले, एक दिवस आमचे ऐका! नागरिकांना ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या !, अशी विंनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.

ब्रिटनमध्ये नव्या रुपातील कोरोना आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. नववर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी स्वागताचे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे ३१ डिसेंबरला एक दिवस लोकांवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी मनसेच्या सरचिटणीस देशपांडेंनी केली आहे.

महापालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयवर मनसेने जोरदार टीका करताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी सवाल केला की,.”तुम्ही नाईट पार्टी करता ते चालते,  मग लोकांना बंधन का? , कोण कुठे पार्ट्या करते हे सर्वांना माहीत आहे”, ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी उद्योगपतींना महाबळेश्वरला जायला परवानगी कशी दिली?, त्यांच्यावर काय कारवाई झाली, असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केला.

संपूर्ण वर्षात कोरोना विषाणूमुळे लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यवसायिक त्रस्त आहेत. सरकार जर प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत असाल तर अमेरिकेसारखे पॅकेज द्या, अशी मागणी देशपांडेंनी केली.