२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण! वाचा अंगावर शहारे आणणारा घटनेचा थरार

२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस केवळ भारतच नाही तर जगाच्या इतिहासातील अत्यंत काळाकुट्ट दिवस. कारण याच दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. अजमल कसाब आणि त्याच्या ९ साथीदारांनी अंधाधुंद गोळीबार करून शेकडो निष्पाप लोकांचे जीव घेतले. आज या घटनेला १३ वर्ष पूर्ण झालीत. पण २६/११ या तारखेनेच आजही लोकांच्या मनात धडकी भरते..आजही या दिवसाची लोकांना धास्ती वाटते. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण होतायेत. १३ वर्षांनंतर सुद्धा ही भळभळती जखम आजही कायम आहे. या हल्ल्यातील कटू आठवणी आजही कायम आहेत.

    मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ हा दिवस केवळ भारतच नाही तर जगाच्या इतिहासातील अत्यंत काळाकुट्ट दिवस. कारण याच दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, ती वेळ होती रात्री सव्वा आठची.अजमल कसाब आणि त्याच्या ९ साथीदारांनी अंधाधुंद गोळीबार करून शेकडो निष्पाप लोकांचे जीव घेतले. आज या घटनेला १३ वर्ष पूर्ण झालीत. पण २६/११ या तारखेनेच आजही लोकांच्या मनात धडकी भरते..आजही या दिवसाची लोकांना धास्ती वाटते. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण होतायेत. अंगावर शहारे आणणारा या संपूर्ण घटनेचा हा आढावा.

    हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण
    आजच्या दिवशी २००८ साली मुंबई संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे गजबजून गेली होती. मुंबई स्थिती सामान्य होती. लोकं बाजारात खरेदी करत होते, तर काही लोकं मरीन ड्राईव्हवर रोजच्याप्रमाणे समुद्रातून येणाऱ्या थंड हवेचा आनंद घेत होते. परंतु जसजशी रात्र पुढे सरत गेली मुंबईच्या काही रस्त्यांवर आरडाओरडा सुरू झाला. या हल्ल्याच्या तीन दिवसापूर्वी २३ नोव्हेंबरला कराचीहून समुद्र मार्गे एका बोटीतून हे दहशतवादी मुंबईत पोहेचले होते. ज्या बोटीतून दहशतवादी आले होते ती भारतीय होती आणि दहशतवाद्यांनी त्या बोटीवरील चार भारतीय प्रवाशांना मारून बोटीवर कब्जा केला होता. सुमारे ८ वाजता हे दहशतवादी कुलाबाजवळील कफ परेडच्या मासे बाजारात उतरले. येथून हे दहशतवादी चार गटात विभागले. त्यानंतर टॅक्सी पकडून आपाआपल्या ठिकाणी गेले. असे म्हटले जाते की, जेव्हा दहशतवादी मासे बाजारात उतरले होते तेव्हा त्यांना पाहून मच्छिमारांना संशय आला होता. याबाबतची माहिती मच्छिमारांनी स्थानिक पोलिसांना दिली होती. परंतु पोलिसांनी याकडे जास्त लक्ष दिले नाही. 26 नोव्हेंबर 2008 याच दिवशी पाकिस्तानमधून आलेले जैश-ए-मोहम्मदचे १० दशतवाद्यांनी मुंबईत बॉम्ब हल्ला केला आणि गोळीबार केला. या दहशतवाद्यादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु हा भारताच्या इतिहासातील काळ दिवस होता. हा दिवस कोणीच विसरू शकत नाही. या दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळपास १९७ लोकं मृत्यूमुखी पडले होते, तर ३०० पेक्षा अधिक लोकं जखमी झाले होते.

    …अन त्या दिवशी मुंबई थांबली
    कायम पायाला भिंगरी लावून धावणारी मुंबई त्यादिवशी थांबली होती, भेदरली होती, 26 नोव्हेंबर 2008 रात्री ८ वाजून १० मिनिटांनी एका बोटीतून 10 तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ उतरतात. आणि त्यातील आठजण भारी बॅगा घेउन उतरतात, तर उरलेले दोघे बोटीतून किनाऱ्यालगत पुढे जातात… पुढे काय घडलं हे अख्ख्या जगानं पाहिलं…. पाकच्या या दहशतवाद्यांनी एटीएस प्रमुख हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, मेजर कमांडो संदीप उन्ऩीकृष्णन, जीवाची बाजी लावून दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे तुकाराम ओंबळे, 18 पोलीस कर्मचारी. ३४ परदेशी नागरिकांसह १९७ लोकांचा बळी घेतला, तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले. नेहमी धावणारी, पळणारी कुणासाठी न थांबणारी मुंबई, त्या दिवशी मात्र थांबली होती, गहिवरली होती.

    मुंबईत एकूण १० ठिकाणी हल्ले
    मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यातील 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांला यश आलं… तर अजमल कसाब या एकमेव दहशतवाद्याला पकडताना पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी प्राणाची आहुती दिली… कसाब आणि त्याच्या 9 दहशतवादी साथीदारांनी मुंबईत एकूण 10 ठिकाणी हल्ले केले…. त्यातील आठ हल्ले दक्षिण मुंबईत म्हणजेच छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला, हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉकजवळ आणि विलेपार्लेत एका टॅक्सीतही बॉम्बस्फोट घडवून दहशत पसवरण्याचा प्रयत्न केला. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्षे झालीत पण पुन्हा हल्ला होणार नाही याची शाश्वती नाही.

    पोलीस अधिकारी शहीद
    26/11 या भ्याड हल्ल्यात आपले जाँबाज पोलीस अधिकारी आणि पोलीस हवालदार हे शहीद झाले. अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला. पाकच्या या दहशतवाद्यांनी एटीएस प्रमुख हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, मेजर कमांडो संदीप उन्ऩीकृष्णन, जीवाची बाजी लावून दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे तुकाराम ओंबळे, 18 पोलीस कर्मचारी. ३४ परदेशी नागरिकांसह १९७ लोकांचा बळी घेतला, तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर रात्री ९.३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सीएसएमटी स्थानकांवरील मुख्य हॉलमध्ये दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवाद्यांमध्ये एक मोहम्मद अजमल कसाब होता ज्याला फाशी देण्यात आली आहे. दोन्ही दहशतवाद्यांनी एके-४७ रायफलमधून १५ मिनिट गोळीबार केला. ज्यामध्ये ५२ लोकं मृत्यूमुखी पडले होते आणि १०० हून अधिक लोकं जखमी झाले होते. दहशतावाद्यांचा हा गोळीबार फक्त सीएसएमटी पुरता मर्यादित नव्हता. दक्षिण मुंबईच्या लिओपोल्ट कॅफेमध्ये देखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. मुंबईतील लोकप्रिय कॅफेपैकी एक लिओपोल्ट कॅफे आहे. या कॅफेमध्ये गोळीबार करून १० लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारले होते. यामध्ये काहीजण परदेशी होती. १८७१ पासून सुरू असलेल्या या कॅफेच्या भिंतींवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराचे निशाण अजूनही आहेत. दरम्यान रात्री १०.३० वाजता विलेपार्लेमधील एका टॅक्सीला बॉम्बने उडवल्याचे समोर आले. ज्यामध्ये चालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेच्या १५-२० मिनिटांपूर्वी बोरीबंदरमध्ये अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले होते. ज्यामध्ये टॅक्सी चालक आणि दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांमध्ये १५ लोकं जखमी झाले होते. या हल्लाचे ऑपरेशन तीन दिवस सुरु होते. या हल्ल्याच्या काळ्या आठवणी आजही मनावर कोरल्या गेल्या आहेत.

    वेदनेची जखम आजही कायम
    २६ नोव्हेंबर २००८ हा भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्यांपैकी एक हल्ला होता. याची कहाणी अत्यंत थरारक आणि वेदनादायक आहे. दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन्ही हॉटेलला रॅपिड अॅक्शन फोर्स (आरपीएफ), मरीन कमांडर आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या कमांडरांनी घरले होते. परंतु माध्यमांच्या लाईव्ह कव्हरेजमुळे सुरक्षा दलाच्या सर्व हालचालींची माहिती टीव्हीवरून दहशतवाद्यांना मिळत होती असं बोललं जात आहे, त्यामुळं माध्यमांनी अतिघाई केल्यामुळं हे ऑपरेशन लांबणीवर पडले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन दिवस ही चकमक सुरू राहिली होती. या दिवशी देशातीलच नव्हे तर जगभरातील १.२५ अब्ज लोकांच्या नजरा ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसवर खिळल्या होत्या. २९ नोव्हेंबरच्या सकाळीपर्यंत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते आणि कसाब पोलिसांच्या ताब्यात होता. मुंबईतील परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आली होती, पण या दहशतवादी हल्ल्यामध्ये १९७ जणांनी आपले प्राण गमावले. १३ वर्षांनंतर सुद्धा ही भळभळती जखम आजही कायम आहे. या हल्ल्यातील कटू आठवणी आजही कायम आहेत. १३ वर्षांनंतर आपण खरोखरच सुरक्षित आहोत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण या भीषण हल्लानंतर सुरक्षेच्या उपायांची चर्चा झाली, उपाययोजनांचे दावे करण्यात आले..पण मुंबईची सुरक्षा आजही रामभरोसी आहे. सुरक्षा, पोलीस यांच्याबरोबर नागरिकांनी सुद्धा सावधनता बाळगली पाहिजे. आणि यंत्रणानी सतर्क राहिजे पाहिजे, तर आणि तरच पुन्हा कोण मुंबईवर वाकड्या नजरेनं किंवा असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणार नाही.