
राज्यभरात आमच्या समाजाची ७० लाख लोकसंख्या आहे. विविध जिल्ह्यात आमचा समाज वासलेला आहे. याचा सरकारने विचार करावा. दि. बां. मुळे (D. B. Patil) अनेक कायदे देशात लागू झाले. देशाने देखील त्यांचा गौरव केला. राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे की; आपण भूमीपुत्रांना (Bhumiputra) न्याय दिला नाही तर तुम्ही राजकारणातून परागंदा व्हाल. जनशक्तीच्या लोंढ्यापुढे तुमचे काहीही चालणार नाही.
नवी मुंबई : दि. बां. (D. B. Patil) चे नेतृत्व व कर्तृत्व श्रेष्ठ होते व राहील. माझे बाळासाहेबांचे जवळचे संबंध असले व मी शिवसेना उपनेता जरी असलो तरी सर्वप्रथम भूमीपुत्र आहे. दि. बां. नी देशाला अनेक कायदे दिले. दि. बा म्हणजे देशाला दिशा देणारे नेते होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सुरू असलेला दि. बा नामकरण लढा इतिहासात नोंदवला जाईल असे उद्गार लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील (Dashrath Patil) यांनी काढले. ते नवी मुंबई वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात (Vishnudas Bhave Natyagruha, Vashi) मंगळवारी आयोजित केलेल्या भूमीपुत्र मेळाव्यात बोलत होते.
राज्यभरात आमच्या समाजाची ७० लाख लोकसंख्या आहे. विविध जिल्ह्यात आमचा समाज वासलेला आहे. याचा सरकारने विचार करावा. दि. बां. मुळे (D. B. Patil) अनेक कायदे देशात लागू झाले. देशाने देखील त्यांचा गौरव केला. राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे की; आपण भूमीपुत्रांना (Bhumiputra) न्याय दिला नाही तर तुम्ही राजकारणातून परागंदा व्हाल. जनशक्तीच्या लोंढ्यापुढे तुमचे काहीही चालणार नाही.
केंद्र सरकार देखील आमच्या मागणीसंदर्भात सकारात्मक असून; केंद्रीय मंत्र्यांनी विनंती केल्याने आम्ही काम विमानतळाचे काम बंद पाडले नाही असे देखील दशरथ पाटील यांनी स्पष्ट करत उपस्थितांचा संभ्रम दूर केला. तसेच दि. बांच्या लढ्यासाठी हौतात्म्य स्वीकारण्यास देखील तयार असल्याचे दशरथ पाटील यांनी सांगत सरकारला इशारा दिला. यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खा. रामशेठ ठाकूर म्हणाले की; कृती समिती स्थापन झाली व लढ्याला सुरुवात झाली. काही लोकांनी संशय व्यक्त केला की लढा थांबला की काय? मात्र दि. बांचे नाव दिल्याशिवाय लढा थांबणार नाही असे ठाकूर म्हणाले.
सिडकोने भूमीपुत्रांची काय अवस्था केली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे. नवी मुंबईसारखा संपूर्ण उरण तालुकाच प्रकल्पात गेला आहे. आपण नागवले गेलो आहोत. जमिनीसोबत अपल्यावरून बुलडोअर चालले आहेत. सेनेची स्थानीय लोकाधिकार समिती का स्थापन झाली? की स्थानिकांचे अधिकार अबाधित राहण्यासाठी. मग नवी मुंबई विमानतळाबाबत आमच्याकडे आमचा अधिकार आहे. दि. बा पाटलांचे नाव द्यावे हे आमचे मागणे आहे. सिडकोने साडेबारा टक्के व साडेबावीस टक्के जाहीर झाले मात्र ते कागदावरच राहिले आहेत. अनेकांना भूखंड मिळाले मात्र ते अडचणीच्या ठिकाणी दिल्याने ते बदलून देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. ५० टक्के लोकांना देखील नुकसानभरपाई मिळालेली नाही असेही ठाकूर म्हणाले.
…तर सिडकोमध्ये घुसणार
आपल्या आंदोलनाचा दणका इतका जबरदस्त होता की; दिल्लीकडे जाणारा ठराव सरकारला थांबवावा लागला. मात्र तो ठराव विखंडीत करण्यासठी काय करता येईल? ते ठरवावे लागेल. जर आपले ऐकले नाही तर सिडकोमध्ये घुसून उत्तर द्यायची तयारी ठेवा असा इशारा रामशेठ ठाकूर यांनी राज्य शासन व सिडकोला दिला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की; कोविडचा प्रकोभ असतानाही आंदोलन केले. पवसाळ्याचे दिवस असतानाही भूमीपुत्र निश्चयाने सहभागी झाले होते मात्र भूमीपुत्रांच्या ताकदीसमोर पावसाला देखील माघार घ्यावी लागली. या आंदोलनाने शासन देखील नरमले आहे. आपल्या समाजाचे केंद्रातील मंत्री कपिल पाटील हे संपूर्ण ताकदीने आपल्यासोबत उभे आहेत. प्रत्येकवेळी प्रकल्पग्रस्तांनीच का माघार घ्यावी? दि. बांच्या नामकरणाच्या रूपाने शासनाने कधी तरी प्रकल्पग्रस्तांचे ऐकावे.
एक तरुण मयुरेश पुढे येतो; शासनाविरोधात बोलल्यावर त्याचा आवाज दाबला गेला. मोजून व ठरवून कारवाई केली गेली. नोटीसा पाठवण्यात आल्या. केसेस दाखल केल्या. मात्र आपला भूमीपुत्र झुकला नाही उलट आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला तर तो त्वेषाने पेटून उठेल अस इशारा ठाकूर यांनी दिला.
यावेळी भूषण पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सिडकोने केलेला ठराव विखंडीत करा. त्यासाठी प्रयत्न करू. भिवंडीचे भारद्वाज चौधरी म्हणाले की; जर तुमचा आमच्या बापाच्या नावाला विरोध असेल तर बाळासाहेबांच्या नावाला आमचा विरोध राहणार. कोस्टल रोडचे काम बंद करण्याचे आदेश असतानाही पोलीस बंदोबस्तात ते काम सुरू आहे. सागरी पुत्रांसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.
दशरथ भगत म्हणाले की दि. बा पाटील ही संबंध भूमीपुत्रांची ओळख आहे. त्यामुळे या नावासाठी कोणताही लढा उभारण्यास तयार आहोत. यावेळी डॉ. राजेश पाटील यांनी ग्रामस्थ कृती समितीकडे आशेने पाहत असून; प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणे गरजेचे आहे. कृती समितीने एमआयडीसीचा विषय घ्यावा, आमच्या जमिनी घेऊन मात्र हाती काहीही दिलेले नाही.चिपी विमानतळ पूर्ण झाला आहे. त्याला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. मात्र ते दिले गेले नाही म्हणजे अजूनही यांच्या मनात नवी मुंबईवर लक्ष असल्याचे दिसून येते असेही डॉ. पाटील म्हणाले.
यावेळी जे डी तांडेल, गुलाब वझे, मनोहर तांडेल यांची भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर माजी खा. संजीव नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार, कृती समितीचे मनोहर पाटील, माजी नगरसेवक रामचंद्र घरत, शैलेश घाग, माजी नगरसेवक व नगरसेविका तसेच पाचही जिल्ह्यांतून आलेले ग्रामस्थ उपस्थित।होते.