vidhan parishad

आज दुपारी दोन वाजेपर्यंत 275 आमदारांनी मतदान केलं आहे. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांनी उशिरा मतदान केले. ही महाविकास आघाडीची रणनिती असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सकाळी 11 वाजेपर्यंतचे एकूण मतदान 142 आमदारांनी मतदान केले होते, तर दुपारी 12 वाजेपर्यंतचे एकूण मतदान केले होते. दुपारी 1 वाजेपर्यंतचे एकूण मतदान झाले होते. आणि आता दुपारी दोन वाजेपर्यंत 275 आमदारांनी मतदान केलं आहे.

    मुंबई : आज विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार आहे. या जागेसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांनी एक एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी करत आहेत. तसेच मतांच्या जुळवाजुळवीसाठी आमदारांना मागील चार दिवसांपासून आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. भाजप व मविआने जोरदार फिल्डिंग (For one one vote MVA and BJP fielding) लावली आहे. यावर आता मतदान प्रक्रिया जवळपास पूर्ण होत येत असताना, आता या निकालावर विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

    दरम्यान, आज दुपारी दोन वाजेपर्यंत 275 आमदारांनी मतदान केलं आहे. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांनी उशिरा मतदान केले. ही महाविकास आघाडीची रणनिती असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सकाळी 11 वाजेपर्यंतचे एकूण मतदान 142 आमदारांनी मतदान केले होते, तर दुपारी 12 वाजेपर्यंतचे एकूण मतदान केले होते. दुपारी 1 वाजेपर्यंतचे एकूण मतदान झाले होते. आणि आता दुपारी दोन वाजेपर्यंत 275 आमदारांनी मतदान केलं आहे. सांयकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि रात्री 8.00 वाजता निकाल स्पष्ट होईल. त्यामुळं कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.