rain in maharashtra

महाराष्ट्रात 29 जानेवारीनंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं आधीच सांगितलं होतं. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) कायम राहणार आहे.

    मुंबई :महाराष्ट्रात (Maharashtra) वारंवार वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. कधी कडाक्याची थंडी (Cold Weather)  तर कधी जास्त तापमानाचे चटके आणि काही वेळा अचानक पाऊस हजेरी लावतो. सध्या राज्यात थंडीचा कडाका आहे. अशातच हवामान विभागानं  एक अंदाज वर्तवला आहे. आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (Meteorology Department) वर्तवण्यात आली आहे.

    उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर आणि पूर्व भागातून येत असलेल्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी देखील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचंही हवामान विभागानं सांगितलं आहे.

    महाराष्ट्रात 29 जानेवारीनंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं आधीच सांगितलं होतं. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) कायम राहणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती राहील. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाने सांगितलं आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण असेल. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    राज्यातल्या या बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आता रब्बी हंगामातदेखील हवामानाचा फटका पिकांना बसणार आहे . त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.