दिशादर्शक फलक नसल्याने कार खड्ड्यात पडली; पाण्यात बुडून कार मध्येच गुदमरून चार शिक्षकांचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू आहे सेनगाव पासून जवळच असलेल्या भानखेडा गावाजवळ पुलाचे बांधकाम मागील काही दिवसापासून ढकलल्याने बंद आहे. मात्र या पुलाजवळ दिशादर्शक फलक नसल्याने विदर्भातील कार खड्ड्यात पडून पाण्यात बुडून कार मध्येच गुदमरून चार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यामध्ये चार शिक्षकांचा समावेश असल्याचे समजते. मृतांची ओळख पटली नसून हे सर्व लोणार तालुक्यातील खळेगाव, पळसखेडा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

    हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू आहे सेनगाव पासून जवळच असलेल्या भानखेडा गावाजवळ पुलाचे बांधकाम मागील काही दिवसापासून ढकलल्याने बंद आहे. मात्र या पुलाजवळ दिशादर्शक फलक नसल्याने विदर्भातील कार खड्ड्यात पडून पाण्यात बुडून कार मध्येच गुदमरून चार शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यामध्ये चार शिक्षकांचा समावेश असल्याचे समजते. मृतांची ओळख पटली नसून हे सर्व लोणार तालुक्यातील खळेगाव, पळसखेडा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

    वळण रस्त्यावर फलकच नाही

    सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असून भानखेडा या गावाजवळ पुलाचे बांधकाम चालू आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या पुलाच्या बांधकामाजवळ कोणतेही दिशादर्शक फलक न ठेवल्याने विदर्भातील लोणार तालुक्यातील पळसखेडा येथील शिक्षक शाळेत रुजू होण्यासाठी जात असताना कार खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना 13 जूनच्या मध्यरात्री घडली. यामध्ये लोणार तालुक्यातील अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    तर अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. वास्तविक पाहता गेल्या अनेक महिन्यापासून सदरील पुलाचे बांधकाम हे प्रगतीपथावर आहे. अहोरात्र काम सुरू असूनही बांधकाम अद्याप अर्धवट आहे. शिवाय बांधकाम ठेकेदाराने या ठिकाणी कोणताही सूचना फलक बसवला नाही. त्यातच हा रस्ता वळणाचा असल्याने वाहन चालकांच्या रस्ता सुरू असलेल्या पुलाचे काम लक्षात येत नाही. त्यातूनच ही घटना घडली असल्याचे घटनास्थळाची पाहणी केली असता, स्पष्ट होते.

    हे सुद्धा वाचा