शिवसेनेच्या माजी आमदाराला अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले? :वाचा सविस्तर

हे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे मंत्री आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. त्यामुळे सुभाष साबणे यांना कुठं जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मला त्यात काही बोलायचं नाही. मुळात ते शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे मला काही विचारण्याऐवजी त्यांनी शिवसेनेबाबत काही भूमिका स्पष्ट करावी. निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनी पक्ष सोडत असताना दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. ते चांगलं होईल.” असं अशोक चव्हाण म्हणाले.

    नांदेड : शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेनेचं शिवबंधन सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर महाविकास आघाडीत सगळं आलबेल नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालं.

    दरम्यान आता अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत साबणे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. निष्ठावतं म्हणवणाऱ्यांनी पक्ष सोडत असताना दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःची भूमिका स्पष्ट करावी असं मत व्यक्त केलं. तसेच सुभाष साबणे मुळात शिवसेनेचे आहेत. मी काँग्रेसचा आहे. त्यामुळे माझ्या संबंध काय? या प्रकरणात माझा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी नमूद केलं. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

    त्यामुळे सुभाष साबणे यांना कुठं जायचं हा त्यांचा प्रश्न असं अशोक चव्हाण म्हणाले. “सुभाष साबणे हे मुळात शिवसेनेचे आहेत. हे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे मंत्री आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. त्यामुळे सुभाष साबणे यांना कुठं जायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मला त्यात काही बोलायचं नाही. मुळात ते शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे मला काही विचारण्याऐवजी त्यांनी शिवसेनेबाबत काही भूमिका स्पष्ट करावी. निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनी पक्ष सोडत असताना दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. ते चांगलं होईल.” असंही यावेळी ते म्हणाले.

    सुभाष साबणे नेमकं काय म्हणाले? 

    सुभाष साबणे म्हणाले, “मी आजही शिवसैनिक आहे. 4 ऑक्टोबरनंतर जो काही निर्णय आहे तो होईल. माझ्या शिवसैनिकाचा अपमान झाला. पोलिसांनी बुटासह तुडवलं. अशोक चव्हाण यांनी बॅनरवर माझ्या नेत्याचा कधीच फोटो छापला नव्हता. बॅनरवर महाविकासआघाडीच्या नेत्याचे फोटो राहावेत. माझ्या मतदारसंघात येताना महाविकासआघाडीचे नेते म्हणून आघाडीतील घटक पक्षाला सोबत घेऊन आलं पाहिजे. तुम्ही पक्षाचा कार्यक्रम राबवायला नको हीच आमची भूमिका होती. त्यामुळेच आम्ही काळे झेंडे दाखवत होतो. तर पोलिसांनी पकडून बुटासह कार्यकर्त्यांना मारलं.”