नितीन गडकरी दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं विधान

राज्यपाल आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील प्रशासकीय इमारत भवनात येत आहेत. इथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करतील. त्यानंतर ते बांबू लागवड प्लॉटला भेट देणार आहेत. दरम्यान शिवाय शेतीविषयक अवजारांची पाहणीही ते करणार आहेत. यावेळी राज्यपालांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

    परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोलीनंतर आज ते परभणीत आहेत. राज्यपाल आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील प्रशासकीय इमारत भवनात येत आहेत. इथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करतील. त्यानंतर ते बांबू लागवड प्लॉटला भेट देणार आहेत.

    दरम्यान शिवाय शेतीविषयक अवजारांची पाहणीही ते करणार आहेत. यावेळी राज्यपालांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

    राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

    नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बांबू लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या, असा सल्ला कोश्यारींनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिला.बांबू लागवडीची पाहणी करताना राज्यपालांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली.

    याशिवाय राज्यपालांनी विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला दिला. पंतप्रधान म्हणतात ‘सब का साथ सब का विकास’ और सबका विश्वास’, याप्रमाणे सगळ्यांनी एकत्रित राहा, असं राज्यपाल विद्यार्थ्यांना म्हणाले.

    मी कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्न नाही

    राज्यपाल सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणालेत. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलं.

    राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा काल किरकोळ अपघात झाला. राज्यपाल कोश्यारी काल हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला. या अपक्षातात 3 गाड्यांचं किरकोळ नुकसान झालं. दरम्यान, या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही.