आमदार नितीन देशमुखांना कार्यकर्त्यांसह पोलिसांनी घेतलं ताब्यात, नागपुरच्या सीमेवर पोलिसांनी रोखली जलसंघर्ष यात्रा; अटकेनंतर संजय राऊतांचे ट्वीट…

10 एप्रिल रोजी अकोल्यातून यात्रेला प्रारंभ झाला होता. उद्या (21 एप्रिल) नितीन देशमुख आणि त्यांचे सहकारी खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला घेऊन उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणार होते. ही जल संघर्ष यात्रा आज देशमुख नागपूरच्या (Nagpur) सीमेवर दाखल झाले होती. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा नागपूर सीमेवर रोखली आहे.

    नागपूर – राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे नितीन देशमुख (Mla Nitin Deshmukh) यांनी त्यांच्या शेकोडे कार्यकर्त्यांसह जल संघर्ष यात्रा काढत होते, 10 एप्रिल रोजी अकोल्यातून यात्रेला प्रारंभ झाला होता. उद्या (21 एप्रिल) नितीन देशमुख आणि त्यांचे सहकारी खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला घेऊन उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणार होते. ही जल संघर्ष यात्रा आज देशमुख नागपूरच्या (Nagpur) सीमेवर दाखल झाले होती. मात्र पोलिसांनी (Police) त्यांची संघर्ष यात्रा नागपूर सीमेवर रोखली आहे. तसेच 500 च्या वर कार्यकर्त्यांसह आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    अटकेनंतर संजय राऊतांचे ट्वीट…

    दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता याचे राजकीय क्षेत्रात पडसाद उमटत आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन राज्य सरकारवर टीका केली आहे. “पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना अटक झाली आहे. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटक केले. महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली आहे. सरकार जनतेलाच घाबरु लागले आहेत”,  असं संजय राऊतांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

    पोलिसांकडून आम्हाला मारहाण…

    खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी ही यात्रा सुरु केली होती. या यात्रेनं 250 किलोमीटरचे अंतर पार केलं होतं. अद्याप 30 किलोमीटर अंतर जाणं बाकी होतं. त्यापूर्वीच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 10 एप्रिलला नितीन देशमुख यांची जल संघर्ष यात्रा सुरु झाली होती. उद्या ही यात्रा फडणवीस यांच्या घरासमोर पोहोचणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी आमदार नितीन देशमुखांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्या परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. “पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे. मात्र, काहीही झालं तरी आम्ही माघार नसल्याचे देशमुख म्हणाले”.