
वानवडी परिसरात दोन दिवसांपूर्वीच एका सराफी व्यावसायिकावर गोळीबार करून त्यांच्याकडील सोने लुटून नेण्यात आले होते. अद्याप चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही. दुसरीकडे शहरात दिवाळीनिमित्ताने खरेदीला मोठी गर्दी होत आहे. तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात खरेदीसाठी गर्दी होत असते. या भागातील सराफी पेढीवर दरोडा घालण्यासाठी चोरट्यांची टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी पिसे, मारणे, बेलदरे, माने, लोहकरे, माने, यांना पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसे, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी
आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या मित्राचा खून झाला होता. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पैशांची जुळवाजुळव सुरू केली होती. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी भारती विद्यापीठ परिसरातील सराफी पेढी लुटण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. ते खून करणार होते. खूनानंतर जामीनासाठी त्यांना पैशांची आवश्यकता भासणार होती. त्यासाठी त्यांनी लुटण्याचा कट रचला होता.