कंत्राटी नोकरभरतीला विरोध! साताऱ्यात संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलनं

राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय लोकविघातक असून तो तात्काळ रद्द ठरण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलायासमोर धरणे आंदोलन केले.

    सातारा : राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय लोकविघातक असून तो तात्काळ रद्द ठरण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलायासमोर धरणे आंदोलन केले.

    महाराष्ट्र सरकारच्यावतीने राज्यातील विवीध विषयांतर्गत अशांतता पसरवण्याच्या धोरण सुरू आहे. सर्व सरकारी नोकर भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय उद्योग, ऊर्जा आणि खानिकर्म विभागाने घेतला. त्याची अंमलबजावणी राज्यातील वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने ज्या नऊ कंपन्यांची नियुक्ती केलेली आहे त्या सर्व कंपन्या भाजप आमदार व सरकार प्रेरित आहेत. यामुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान होऊ शकते. २० पटसंख्या पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या सर्व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा समूह शाळा योजनेच्या नावावर बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय सरकारने घेतला आहे. गाव तिथे शाळा या संकल्पनेला यामुळे छेद बसणार असून समूह शाळांचा प्रस्ताव हा सर्वसामान्य जनते विरोधी असून गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेपासून लांब ठेवण्याचा शिक्षण विरोधी प्रकार आहे. ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र खाजगी कंपन्या मार्फत कंत्राटी करत असल्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सुद्धा निर्णय आरोग्य विभागाचे कंत्राटीकरण करण्याचा दुर्दैवी निर्णय असून संभाजी ब्रिगेड याही विरोधात असून यासंदर्भात तीव्र विरोध करत निषेध करण्यात आला.

    यावेळी जिल्हाध्यक्ष रफीक शेख, तेजस्विनी केसरकर, संतोष मालुसरे, महेबुब पठाण, ऍड. वनिता भोसले-पाटील, पूजा सावंत, शोकत शेख, सुजित दगडे आदी उपस्थितीत होते.