
पिंपरी : लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर श्री अष्टविनायक शिवपुराण कथा वाचन सोहळा सुरू आहे. आज चौथ्या दिवशी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोहळ्याला भेट दिली.
पंडित प्रदीप मिश्रा आपल्या शिव कथा भाविकांना सांगताना पुढे म्हणाले कि; आपल्या घरात कोणतेही शुभकार्य करायचे असले तर प्रथम गणेशाचे वंदन केले जाते. घरात लग्न सोहळा असो कि अन्य काही कार्यक्रम गणेशाचे आशीर्वाद घेतले जातात. भगवान शंकराची पूजाअर्चा करावी. आपण राहतो त्या ठिकाणी यज्ञ करावेत. यासाठी सर्वाना आमंत्रण द्यावे. पत्रिकेकवर विशेष लक्ष द्यावे असेही पंडित मिश्रा यांनी सांगितले.
घरात विवाह सोहळा असेल तर पहिली लग्नपत्रिका गणेशासमोर ठेवण्यात येते. यामागे मोठे शाश्त्र आहे. देवांच्या काळात पृथवीवर यज्ञकरायचे ठरले होते. त्यावेळी सर्व लोकात पत्रिका निमंत्रण देण्यासाठी कोण जाणार यावरून मोठी चर्चा झाली. गणेश गणपतीचेसर्वांशी चांगले संबंध असल्याने हे काम गणेशजींना देण्यात आले. त्यामुळे गणपती पुढे पहिली पत्रिका ठेवली जाते, असे पंडित मिश्रायांनी सांगितले.
पं. प्रदीप मिश्रा यांनी अतिथी कसा असावा यावर मार्गदर्शन करताना म्हाणाले की, ‘अतिथी देवो भव’ अशी आपली संस्कृती आता लोपपावत चालली आहे. आता येणारे अतिथी हे दोन प्रकारचे असतात. एक जो मन पाहून येतो, दुसरा जो तुमची आर्थिक स्थिती पाहून येतो. तुमची आर्थिक स्थिती पाहून येणाऱ्यांना तुम्ही अतिथी म्हणू शकत नाही. ते केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी जवळीक साधत आहेत.
आरोग्य व शिक्षण मोफत हवे…
शिव पुराण कथेतील सिद्धीविनायक गणेशाचा महिमा विशद करताना पं. प्रदीप मिश्रा यांनी राज्यकर्त्यांकडून अपेक्षाही केल्या. शिवपुराणामध्ये उल्लेख आहे. भगवान शंकराने मानवजातील दोन महत्त्वाच्या बाबी दिल्या. बुद्धीची देवता श्री गणेश आणि दवाई अर्थातमहामृत्यूंजय मंत्र. त्यामुळे राज्यकर्त्यांना पुण्यातून केंद्रापर्यंत संदेश गेला पाहिजे की, अन्न किंवा वस्त तुम्ही मोफत देवू नका. आरोग्यसेवा व शिक्षण हे कोणत्याही राष्ट्रात मोफत असायला हवे. अनेक गरीब नागरिकांचा मृत्यू चांगल्या आरोग्य सुविधांसाठी मोठा खर्च करून शकल्याने होतो. अनेक चांगल्या विद्यार्थ्यांना देखील क्षमता असून देखील पैशांअभावी दर्जेदार शिक्षण घेता येत नाही. त्यामुळेकोणत्याही राष्ट्रामध्ये आरोग्यसेवा व शिक्षण या दोन गोष्टीतरी किमान मोफत असाव्यात. यासाठी प्रत्येक राज्यकर्त्याने प्रयत्न करायलाहवेत, असे आवाहनही पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले.
गेल्या दोन दिवसांत भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, राजस्थान येथील आमदारकेसाराम चौधरी, माजी खासदार नानासाहेब नवले, अशोक मोहोळ, बाप्पुसाहेब भेगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, विभागकार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, प्रांत संपर्कप्रमुख मिलिंदराव देशपांडे, प्रांत मंडलसदस्य प्रकाश मिठभाकरे, भाजपाचे प्रदेश प्रवक्तेएकनाथ पवार, माजी नगरसेविका झामाबाई बारणे, अश्विनी चिंचवडे, कामगार उपायुक्त अभय गीते, उद्योजक नितीन काकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महापालिकाअतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, शहर अभियंता मकरंद निकम, शिवसेनाजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, पोलीस उपाधीक्षक राहुल आवारे, भाजपाच्या युवा मोर्चासरचिटणीस तेजस्विनी कदम, कांतीलाल गुजर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.