पालकांनी मुलांबाबत दक्ष राहण्याची गरज: अजित पवार

आजची मुलं ही देशाचे भविष्य आहेत.त्यामुळे आजची पिढी सदृढ आणि सशक्त असणे गरजेचे आहे.पालकांनी मुलांबाबत यासाठी दक्ष असणे आवश्यक आहे.बारामतीत आज पोषक आहार अभियान सुरु होत असल्याचे मनापासुन समाधान वाटते,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

    बारामती : आजची मुलं ही देशाचे भविष्य आहेत.त्यामुळे आजची पिढी सदृढ आणि सशक्त असणे गरजेचे आहे.पालकांनी मुलांबाबत यासाठी दक्ष असणे आवश्यक आहे.बारामतीत आज पोषक आहार अभियान सुरु होत असल्याचे मनापासुन समाधान वाटते,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

    बारामती येथे नटराज नाट्य कला मंदीर,श्री सदगुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापुर आणि श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकीत्सालय व रीसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी मोदामृत अभियानाची पवार यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली.यावेळी पवार बोलत होते.यावेळी पवार म्हणाले, केंद्र सरकारने कुपोषण मुक्तीसाठी राष्ट्रीय पोषण कार्यक्रम आखला आहे.आरोग्य आणि शिक्षणाला महत्व देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.त्यासाठी राज्य सरकार विविध कार्यक्रम आखत आहे.कुपोषणाच्या विळख्यातून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे.पोषक आहाराच्या कमतरतेने वेगवेगळे आजार होतात.अन्न हे पुर्णब्रम्ह आहे.शरीराची झीज भरुन काढणे,कार्यशक्ती वाढण्यासाठी अन्नाची गरज आहेे.मुलांंच्या चाैरस ,समतोल आहारात पोषक आहार महत्वपुर्ण आहे.यामध्ये पोषक घटक,पाणी,जीवनसत्वाची आवश्यकता रोजच्या आहारात समावेश असावा.त्यासाठी पालकांनी लक्ष द्यावे.बारामतीत आज हे पोषक आहार अभियान सुरु होत असल्याचे मनापासुन समाधान आहे,असे यावेळी पवार म्हणाले.यावेळी आनंद महाराज सांगवडेकर म्हणाले,मोदामृत पोषक आहार अभियानाद्वारे सुदृढ बारामती करुया,असे आवाहन केले.यावेळी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे,माजी उपननगराध्यक्ष बिरजु मांढरे,सुधीर पानसरे,डाॅ.साैरभ मुथा आदी उपस्थित होते.

     

    संपुर्ण कोल्हापुर जिल्ह्यात लहान मुलांची आरोग्य तपासणी,पोषक पदार्थांचे बिस्कीट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.आज महात्मा गांधी जयंती,लालबहादुर शास्त्री जयंती दिनी बारामतीत देखील असा प्रयोग आजपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे.

    किरण गुजर, अध्यक्ष नटराज नाट्य कला मंडळ.