सांगलीत व्यावसायिकांना सवलती द्या ; पृथ्वीराज पाटील यांची मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी

पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोना टाळेबंदीमुळे त्यांना व्यवसाय करता आला नाही. टेलरिंग, सलून,लॉन्ड्री, कापड, भांडी, कटलरी, स्टेशनरी, पुस्तके, इलेक्ट्रिक, हार्डवेअर, हॉटेल, रेस्टॉरंट व अन्य दुकानांचे मोठे नुकसान आहे. स्थानिक पातळीवरील व्यावसायिक घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय नोंदणी फी यामध्ये त्यांना सूट द्यावी.

    सांगली : कोरोनामुळे सांगली जिल्ह्यातील छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. टाळेबंदीमुळे त्यांना व्यवसाय करता आला नाही. त्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.

    पाटील यांनी मुंबईत मंत्रालयामध्ये मंत्री वडेट्टीवार यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. मंत्री वडेट्टीवार यांनी यावर लवकरच बैठक घ्यावी, असे आदेश आपत्ती व्यवस्थापनाच्या उपसचिवांना दिले.

    पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोना टाळेबंदीमुळे त्यांना व्यवसाय करता आला नाही. टेलरिंग, सलून,लॉन्ड्री, कापड, भांडी, कटलरी, स्टेशनरी, पुस्तके, इलेक्ट्रिक, हार्डवेअर, हॉटेल, रेस्टॉरंट व अन्य दुकानांचे मोठे नुकसान आहे. स्थानिक पातळीवरील व्यावसायिक घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय नोंदणी फी यामध्ये त्यांना सूट द्यावी. जागेच्या भाड्यामध्ये सूट मिळावी. करामध्येही सवलत द्यावी, व्यापाऱ्यांच्या कर्जावरील दोन महिन्यांचे व्याज आणि दंड माफ करण्याविषयी बँकांना आदेश द्यावेत. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदत वाढवावी. वीजबिल भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळावी.