साताऱ्याची समीकरणे पुन्हा चर्चेत : बहुसदस्यीय प्रभागांमुळे स्थानिक आघाड्या ठरणार प्रभावी; साताऱ्यात राहणार राजे गटांचाच दबदबा

राज्य निवडणूक आयोगाने अधिकाधिक तोडफोड न करता प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यामुळे सातारा पालिकेच्या विद्यमान नरसेवकांना बहुसदस्यीय पद्धतीचा मोठा फटका बसणार नाही. केवळ हद्दीच्या काठावरील प्रभागांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकतो. असे असले तरी आरक्षणाचा मात्र विद्यमान नगरसेवकांना फटका बसणार हे निश्चित. राज्यात तिघाड अन् वार्डात बिघाड अशीच सध्याची तरी अवस्था आहे.

    सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार असल्याने सातारा पालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे . इच्छुकांना आता राजकीय पक्ष व आघाड्याच तारणार असल्याने आघाड्यांची राजकीय समीकरणे प्रभावी ठरणार आहेत . आमदार व खासदार गटाचे राजकीय मैदान आत्तापासूनच गाजू लागलेले असताना राष्ट्रवादीचा तिसरा पर्याय काय ? की भाजप कमळाच्या चिन्हावर स्वतंत्र येणार या राजकीय शक्यतांची राजकीय मांडणी सुरू झाली आहे .

    बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा विद्यमान नगरसेवकांवर फारसा प्रभाव पडणार नसला तरी काहींना आरक्षणाचा फटका मात्र निश्चित बसू शकतो.
    सातारा अ वर्ग पालिका आहे. या पालिकेतील सत्ता समिकरणे, राजकीय घडामोडींकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असते. सध्या पालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या आघाडीची सत्ता आहे. यंदाही पालिकेचा गड काबीज करण्यासाठी खासदारांची आघाडी पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरली आहे. तर विरोधकांनी देखील कंबर कसली आहे. या सर्वांना शह देण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधणाºया इच्छुक उमेदवारांना मात्र, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा यंदाही फटका बसणार आहे.

    इच्छुक उमेदवार कितीही सक्षम असला, जनमानसात त्याची प्रतीमा कितीही चांगली असली, त्याच्यात निवडणूक येण्याची क्षमता जरी असली तरी राजकीय पक्ष व आघाड्यांपुढे त्याचा टीकाव लागणे अवघड आहे. असे उमेदवार निवडणुकीत एकतर पराभूत होतात किंवा निवडणुकीतून माघार घेतात. अशा उमेदवारांना केवळ राजकीय पक्ष व आघाड्याच तारु शकतात, मात्र, आरक्षणानंतरच हे चित्र स्पष्ट होऊ शकते.

    राज्य निवडणूक आयोगाने अधिकाधिक तोडफोड न करता प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यामुळे सातारा पालिकेच्या विद्यमान नरसेवकांना बहुसदस्यीय पद्धतीचा मोठा फटका बसणार नाही. केवळ हद्दीच्या काठावरील प्रभागांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकतो. असे असले तरी आरक्षणाचा मात्र विद्यमान नगरसेवकांना फटका बसणार हे निश्चित. राज्यात तिघाड अन् वार्डात बिघाड अशीच सध्याची तरी अवस्था आहे.

     तिसऱ्या पर्यायाची ही होणार चाचपणी
    साताऱ्याच्या राजकारणाची स्पर्धा जल मंदिर ते सुरूची या दोन सत्ता केंद्रामध्येच असते . बहुसदस्यीय प्रभागासाठी नव्या दमाचे व इलेक्टिव्ह मेरिटचे उमेदवार देण्याची दोन्ही राजांची तयारी सुरू झाली आहे . हद्दवाढीनंतर तब्बल पाच नगरसेवक आगामी इलेक्शन मध्ये देणाऱ्या शाहूपुरी भागावर दोन्ही राजांची मुख्यत्वाने मदार आहे . त्यामुळे कण्हेर पाणीपुरवठा योजनेचा हुकमी पत्ता खेळण्यास खासदार गट सज्ज आहे . इकडे राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केली आहे . गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व संपर्क मंत्री दिवाकर रावते यांच्या यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सज्ज झाली आहे . भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यात बैठक घेऊन स्वबळाचा शड्डू ठोकला आहे . त्यामुळे वॉर्ड आरक्षणापूर्वीच सातारा पालिकेच्या राजकारणाचे पडघम वाजू लागले आहेत .