ravindra dhangekar

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले. आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत,अशा शब्दात शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मला मत देऊन निवडून आणलं आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी जनतेचा आभारी असल्याचंही धंगेकर म्हणाले.

पुणे:माझ्या विजयामुळे भाजपचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे भाजप (BJP) आता जनतेची कामे करताना दिसत आहे, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे (Kasba) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत तेबोलत होते.

गेल्या काही वर्षांपासुन पुणे शहरातील नागरिकांना मिळकत करात सवलत मिळावी, यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. या प्रयत्नांना यश आलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. त्यामध्ये शहरातील मिळकत करात 40 टक्के सवलत देण्याची घोषणा केली असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात आम्हीदेखील अनेक आंदोलनं केली आहेत. आशिया खंडात सगळ्यात जास्त टॅक्स घेणारी ही पालिका आहे, हे मी आधी सांगितलं होतं. आता 500 स्केवर फूट घरांसाठी कर कमी करावा ही मागणी करणार असल्याचं ते म्हणाले.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले. आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत,अशा शब्दात शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मला मत देऊन निवडून आणलं आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी जनतेचा आभारी असल्याचंही धंगेकर म्हणाले.

पुणे शहरात जवळपास 10 लाख मिळकती आहे. त्या सर्व मिळकतधारकांकडून महापालिका प्रशासन मिळकत कर वसुली करत होते. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून मांडली. आमदार झाल्यावरही विधिमंडळात हीच मागणी केली. त्या मागणीला यश आलं असल्याचं ते म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. आता मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना सवलत दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील 500 फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी. हीच मागणी विधिमंडळात करणार असून आमची मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आवाज उठवणार असल्याचं ते म्हणाले. वाड्यांच्या प्रश्नासंदर्भात मी दोन दिवसांपूर्वी बोललो होतो वेळ पडली तर न्यायालयात जाऊ. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळायला हवा, वाडे पडायला आलेत, विकास होत नाही, गरज पडली तर न्यायालायात दाद मागू, असंही ते म्हणाले.