शालेय गणवेश घालून रिपाईचे साताऱ्यात अनोखे आंदोलन ; समूह शाळेचा निर्णय रद्द करण्याची केली मागणी

वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातच आंदोलन करण्यात आले. सर्व आंदोलकांनी खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट परिधान करून जिल्हाधिकारी यांच्या कक्षा समोरच ठिय्या दिला.

    सातारा : वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातच आंदोलन करण्यात आले. सर्व आंदोलकांनी खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट परिधान करून जिल्हाधिकारी यांच्या कक्षा समोरच ठिय्या दिला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांनी समक्ष निवेदन स्वीकारावे असा आग्रह धरला यानंतर जिल्हाधिकारी यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.

    निवेदनात म्हटले आहे की आई-वडिलांनंतर दुसरे मातृत्व म्हणजे शिक्षण आहे. हे शिक्षण दत्तक घेण्याच्या अर्थात विकण्याच्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतला आहे हा निर्णय संविधान विरोधी असून सर्व सामान्य वंचित मुलांना क्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे सरकारी शाळा चालवण्याची पात्रता राज्य सरकारची नाही तर मग सरकारला काय उपयोग हे मातृत्व अबाधित ठेवण्यासाठी सरकारने संविधान विरोधी घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

    यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अप्पा तुपे, महिला जिल्हाध्यक्षा बनसोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनास सहभागी झाले होते.