शिक्षणासाठी चिमुकल्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास, प्रशासनाच्या हलगरजीपणामुळे विद्यार्थ्यांचे हाल

शाळेच्या आणि गावामध्ये रस्ता नसल्यामुळे ही कसरत करावी लागत आहे.

    संभाजीनगर : गंगापूर तालुक्यामधील भिवधानोरा येथील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गंगापूर तालुक्यामधील शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत घालून जावे लागत आहे. जायकवाडीच्या एक किलोमीटर बॅकवॉटर मध्ये सडलेल्या थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यावेळी थर्माकोलवर अनेक वेळा साप चढतात असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. गंगापूर येथील मुले हे थर्माकोलवर बसून नदी पार करून शाळेमध्ये जात आहेत.

    शाळेमधील मुले ही थर्माकोलवर बसून त्या थर्माकोलचा वापर बोटीसारखा करून नदी पार करतात. शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ही तारेवरची कसरत करावी लागते आहे. नदीपात्रातून बाहेर पडताना नदीपात्राच्या परिसरामध्ये असलेल्या गावातून त्यांना वाट काढावी लागते. शाळेच्या आणि गावामध्ये रस्ता नसल्यामुळे ही कसरत करावी लागत आहे. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु अद्यापही अहवाल दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.

    दरम्यान या गावात जाण्यासाठी नऊ कोटी रुपयांतून पूल तयार होऊ शकतो. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याचसंदर्भात गावामधील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या हलगरजीपणामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.